शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

India China FaceOff: भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 5:01 PM

काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.

ठळक मुद्देचीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत.चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहेपोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या चीनी आणि भारतीय सैनिकांच्या संघर्षानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, या घटनेनंतर भारत आणि चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. भारतीय सैनिकांना लोखंडाच्या रॉडने, दगडाने हल्ला करण्यात आला. एलएसीवर झालेल्या या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर ७० हून अधिक जवान जखमी झालेत.

या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात की, चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहे. त्यासोबत चीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.

या ऑडिओ क्लीपची पुष्टी अद्याप कोणीही केली नाही पण ही व्हायरल क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीने ही बातमी दिली आहे. ऑडिओ क्लीपमध्ये चायनाचे ब्लॅक कमांडो सैनिक या प्रदेशात आले आहेत, भारतीय जवानांना त्यांनी मारहाण करुन पाठवलं आहे. सरकार २० जवान शहीद झाले आहेत असं सांगतात पण अंदाजे २००-२५० जवान शहीद झाले आहेत, चीनचे जवान मृत्यू झाले नसून काही जखमी आहेत, भारत काही करणार नाही, चीन लेहचा अर्धा भाग ताब्यात घेईल असं या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं राष्ट्राला सांगितले असून देशाची एकता, अखंडता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत शांतता प्रस्थापित करु इच्छितो पण जर कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर देण्यास सक्षम आहे असा इशारा चीनला दिला आहे.

 काय घडलं होतं?

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसIndiaभारतchinaचीन