शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

India-China Faceoff : गलवाननंतर आता 'या' महत्वाच्या भागातून चिनी सैन्य मागे; मात्र, रिज लाइनवर हालचाल सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 17:07 IST

यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलडाखच्या हॉट स्प्रिंग येथील पेट्रोल पॉइंट 15वरू भारत आणि चीनी सैन्य 2 किलो मीटर मागे हटले आहे. गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून जवानांना गुरुवारी अथवा शुक्रवार दोन किलोमीटर मागे घेतले जाईल.पूर्वी फिंगर 4च्याही पूढील भागापर्यंत भारतीय जवान गस्त घातल होते.

नवी दिल्ली - पूर्वी लडाखमधीलभारत-चीन वाद आता निवळताना दिसत आहे. हा वाद जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. आता चीननेलडाखमधील आणखी एका वादग्रस्त ठिकाणावरून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या हॉट स्प्रिंग येथील पेट्रोल पॉइंट 15वरू भारत आणि चीनी सैन्य 2 किलो मीटर मागे हटले आहे. तसेच सूत्रांनी सांगितले, की गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून जवानांना गुरुवारी अथवा शुक्रवार दोन किलोमीटर मागे घेतले जाईल.

अशी आहे सद्य स्थिती -सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पेगाँग सरोवराजवळ फिंगर 4 भागात चीनी सैन्याची हालचाल दिसत आहे. या भागातून चीनी सैन्याने आपल्या गाड्या आणि टँक मागे घेतले आहेत. मात्र, रिज लाइनवर अद्यापही हालचाली सुरूच आहेत. पूर्वी फिंगर 4च्याही पूढील भागापर्यंत भारतीय जवान गस्त घातल होते. मात्र, फिंगर 4 वर चिनी सैन्याने कब्जा केल्यानंतर या भागात गस्त घालण्यात अडथळा निर्माण झाला.

यापूर्वी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची माघार - यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताने चीनी सैन्य हटल्याचे फिजिकल व्हेरिफिकेशनही केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जूनलाच कोर कमांडर स्तरावरील बैठकीत यावर सहमती झाली होती. यानंतर 30 जूनला कोर कमांडरच्या तिसऱ्या स्तरावरील बैठकीत  डिसएंगेजमेन्टच्या पुष्टीसाठी 72 तासांचा वॉच पिरियडदेखील निश्चित करण्यात आला होता. यानंतर आता दोन्हीकडूनही सैन्य मागे घेतले गेल्याचे वृत्त आहे. 

15 जूनला झाली होती हिंसक झटापट -भारत आणि चिनी सैन्यांत गेल्या गलवान खोऱ्यात गेल्या 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर चीनचे जवळपास 35 जवान मारले गेल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थेने म्हटले होते. यासंदर्भात चीने अद्यापही अधिकृत आकडा घोषित केलेला नाही. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव अधिकच वाढत चालला होता. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावborder disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनladakhलडाख