शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 9:19 AM

भारताची चीनला लागून ३,४८८ किलोमीटर इतकी सीमा प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे

नवी दिल्ली: वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनमधील तणाव कमी झाला आहे, मात्र, चिनी सैन्याने अद्याप माघार घेतली नाही. पँगोंग आणि गोगरा भागात चीनचे सैन्य माघारी परतले नाही. या भागात सैनिकांची संख्या कमी करण्यात आली असली तरी अद्यापही दोन्ही देशांचे सैनिक अद्याप तैनात आहेत. मात्र आता चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान तैनात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

भारताची चीनला लागून ३,४८८ किलोमीटर इतकी सीमा प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे. ही प्रत्यक्ष ताबा रेषा हलवण्याचे चीनचे मनसुबे असल्याने तणाव वाढला आहे. सीमेवर आणखी जवान तैनात करण्यात येणार आहे. परिणामी सैन्याच्या बजेट ताणला गेला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दोन्ही देशात यापूर्वी झालेल्या कुठल्याही कराराचे चीनकडून सीमेवर पालन होत नाहीए. यामुळे तणाव आणखी वाढल्याने सीमेवर अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चिनी सैन्य अजूनही फिंगर -४ च्या रिज भागात तैनात आहे. तर फिंगर -४ मधून माघार घेऊन फिंगर -५ वर आपले लष्कर तैनात आहे. मात्र, गलवान आणि हॉट स्प्रिंग भागात डिसएंगेजमेंटची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. 

दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती आता सुरळीत व शांत होण्याच्या दिशेने आली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कमांडर स्तरावरील चर्चेच्या पाचव्या फेरीतील उर्वरित प्रश्न सोडविण्याची तयारी सुरू आहे. कमांडर-स्तरावरील चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत आणि सीमा संबंध चर्चा आणि समन्वय यावर तीन बैठका झाल्या आहेत, असेही वांग वेनबिन यांनी सांगितले.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानchinaचीनIndiaभारत