शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

नरेंद्र मोदी नव्हे 'सरेंडर मोदी', चीन वादावरून राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 14:05 IST

यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत आणि चिनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीच्या मुद्द्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला होता.

ठळक मुद्देकाँग्रेसनेते राहुल गांधी सातत्याने मोदींवर निशाणा साधत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने ट्विट केले, की ही वेळ राजकारणाची नव्हे रणनीतीची आहे.वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.

नवी दिल्ली : लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून काँग्रेसनेते राहुल गांधी सातत्याने मोदींवर निशाणा साधत आहेत. ते या जवानांच्या मुद्द्यावर सातत्याने केंद्र सरकार समोर सवाल खडा करत आहेत. 

रहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी जपान टाइम्सचा एक लेख ट्विट करत, 'नरेंद्र मोदी खरेतर सरेंडर मोदी आहेत', असे म्हटले आहे. भारताचेचीनबरोबरचे सध्याची धोरण शांततेचे आहे, असे जपान टाइम्सने म्हटले आहे.

PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा

यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत आणि चिनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीच्या मुद्द्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान म्हणाले होते, ना कुणी आपल्या सीमेत घुसले आहे, ना आपली कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात आहे. लडाखमध्ये आपल्या 20 वीर जवानांना हौतात्म्य आले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे तिरप्या नजरेने पाहिले, त्यांना ते धडा शिकवून गेले.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी, जेथे भारतीय जवानांना वीरमरण आले, ती भूमी चीनची होती, तर मग आपल्या जवानांना का मारण्यात आले? त्यांना कोठे मारण्यात आले?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

लडाखच्या गलवान खोऱ्यात 20 जवानांच्या बलिदानानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर, आता वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सर्वपक्षीय बैठकीनंतर जो वाद सुरू झाला आहे, त्यानंतर मी चिंतीत आहे. ही वेळ एकी दाखवण्याची आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने ट्विट केले, की ही वेळ राजकारणाची नव्हे रणनीतीची आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीborder disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनSoldierसैनिक