शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

नरेंद्र मोदी नव्हे 'सरेंडर मोदी', चीन वादावरून राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 14:05 IST

यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत आणि चिनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीच्या मुद्द्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला होता.

ठळक मुद्देकाँग्रेसनेते राहुल गांधी सातत्याने मोदींवर निशाणा साधत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने ट्विट केले, की ही वेळ राजकारणाची नव्हे रणनीतीची आहे.वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.

नवी दिल्ली : लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून काँग्रेसनेते राहुल गांधी सातत्याने मोदींवर निशाणा साधत आहेत. ते या जवानांच्या मुद्द्यावर सातत्याने केंद्र सरकार समोर सवाल खडा करत आहेत. 

रहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी जपान टाइम्सचा एक लेख ट्विट करत, 'नरेंद्र मोदी खरेतर सरेंडर मोदी आहेत', असे म्हटले आहे. भारताचेचीनबरोबरचे सध्याची धोरण शांततेचे आहे, असे जपान टाइम्सने म्हटले आहे.

PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा

यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत आणि चिनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीच्या मुद्द्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान म्हणाले होते, ना कुणी आपल्या सीमेत घुसले आहे, ना आपली कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात आहे. लडाखमध्ये आपल्या 20 वीर जवानांना हौतात्म्य आले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे तिरप्या नजरेने पाहिले, त्यांना ते धडा शिकवून गेले.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी, जेथे भारतीय जवानांना वीरमरण आले, ती भूमी चीनची होती, तर मग आपल्या जवानांना का मारण्यात आले? त्यांना कोठे मारण्यात आले?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

लडाखच्या गलवान खोऱ्यात 20 जवानांच्या बलिदानानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर, आता वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सर्वपक्षीय बैठकीनंतर जो वाद सुरू झाला आहे, त्यानंतर मी चिंतीत आहे. ही वेळ एकी दाखवण्याची आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने ट्विट केले, की ही वेळ राजकारणाची नव्हे रणनीतीची आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीborder disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनSoldierसैनिक