शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 25, 2020 10:07 PM

लवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत-चीन संबंध टोकाचे ताणले गेले आहेत.

नवी दिल्ली -लडाखमध्ये LACवर तणावाचे वातावरण आहे. अशातच, ''चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले, तर आमचे जवान सेल्फ डिफेन्स (स्व-संरक्षणासाठी) गोळी चालवतील,'' असा इशारा भारतानेचीनला दिला असल्याचे सरकारी सूत्रांकडून समजते. 

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत-चीन संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. त्या घटनेनंतर चीनने भारताच्या पेट्रोलिंग पॉइंट्सवर मोठ्या प्रमाणावर आपले सैनिक तैनात केले आहेत. यानंतर भारताने पुन्हा असे झाले तर परिणाम भोगायला तयार रहा, असा इशाराही ड्रॅगनला दिला आहे. गलवानमधील घटनेनंतर, चीनच्या शांततेच्या आवाहनावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे स्पष्ट झाले आहे. 

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

असा आहे भारताचा प्रस्ताव - लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीन तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. यातच भारताने चीनला एक प्रस्ताव दिला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माल्‍दो येथे झालेल्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत भारताने म्हटले आहे, चीनने सर्व ठिकाणांनवरून मागे सरकायला हवे. भारताच्या मते देपसांगमधील मैदानांपासून ते पेंगाँगच्या दक्षिणेकडील भागापर्यंत सर्व ठिकाणांवरून चीनने मागे सरकायला हवे. ही प्रक्रिया निवड केल्याप्रमाणे व्हायला नको. मात्र, चिनी सैनिकांनी सर्वप्रथम एलएसीवरून मागे सरकावे, हा प्रस्ताव चीनला अमान्य आहे. त्यांचे म्हणणे आहे, की भारतीय जवानांनी सर्वप्रथम दक्षिण पेगाँग त्‍सो भागातून मागे सरकायला हवे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

गलवान झटापटीनंतर भारत-चीन तणाव वाढला -जवळपास 40 वर्षांत पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये गलवानमध्ये झटापट झाली. चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सांगितले आहे. गलवानच्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणावात आणखी वाढ झाली. 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर चिनी सैनिकांनी पेगाँग सरोवराच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचे केलेले प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले होते. आधी चीनने पुढे सरकण्यास व सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यानंतर भारतही सरसावला आहे.

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

चीनी लष्कराची मोठी हानी -गलवान खोऱ्यातील झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तर काही जवान जखमी झाले होते. या घटनेत चीनी लष्कराची मोठी हानी झाली होती, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला होता. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू शीजिन यांनी राजनाथसिंह यांच्या वक्तव्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण आपल्या ट्विटला जोडून ‘गलवानमधील संघर्षात भारतापेक्षा चीनचे कमी नुकसान झाले आहे, तसेच एकाही चिनी सैनिकाला भारताने ताब्यात घेतलेले नाही. उलट अनेक भारतीय सैनिकांना चिनी लष्कराने पकडले होते. चीनचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले, ही खोटी बातमी आहे’ असे म्हटले होते. 

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनIndiaभारतladakhलडाख