शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 09:24 IST

भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीभारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल' असं म्हणत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 

"चीननेभारताच्या जमिनीवर कब्जा मिळवलाय आणि भारत सरकार 'चेम्बरलेन'सारखं वागत आहे. यामुळे चीन आणखी पुढे जाईल. भारताला मात्र मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत मोजावी लागेल" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्विटसोबत राहुल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजनाथ सिंह यांच्या लेह दौऱ्याचा आहे. 'भारत चीन दरम्यान चर्चेतून तोडगा काढणं कितपत शक्य आहे हे सांगता येणं कठीण आहे' असं राजनाथ सिंह यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

जगातील कोणतीही ताकद भारताची एक इंच जमिनही घेऊ शकत नाही, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. लडाखच्या लुकूंग भागात एका फॉरवर्ड पोस्टवर लष्कर तसेच भारत तिबेट सीमा पोलीस जवानांना संबोधित करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात याआधीही एक व्हिडीओ शेअर केला होता, त्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती.

देशाची अर्थव्यवस्था, शेजारील राष्ट्रांशी संबंध आणि परराष्ट्र धोरणाबाबत राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. चीनने घुसखोरी करण्यासाठी नेमकी हीच वेळ का निवडली, असा सवाल उपस्थित केला होता. अशी वेळ का आली आहे, ज्यामुळे आपण भारताविरोधात पाऊल उचलू शकतो, असा चीनच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. देशाचे संरक्षण हे मुख्यत्वेकरून परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या विश्वासावर अवलंबून असते. मात्र गेल्या सहा वर्षांत आपला देश या सर्व बाबतीत अपयशी ठरला आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश

काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार 

कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपा