राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:21 IST2025-08-07T13:21:14+5:302025-08-07T13:21:46+5:30

INDIA Alliance: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंडिया आघाडीतील सर्व पक्षप्रमुखांसाठी खास जेवणाचे आयोजन केले आहे.

INDIA Alliance: Rahul Gandhi's 'dinner diplomacy', an attempt to revive the cold INDIA alliance | राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

INDIA Alliance: केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी मिळून INDIA आघाडीची स्थापना केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीतील परभवानंतर या आघाडीत हळुहळू फूट पडत गेली. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष याच थंड पडलेल्या इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुखांसाठी खास जेवणाचे आयोजन केले आहे. 

बिहारमध्ये सुरू असलेल्या नवीन मतदार यादीच्या (SIR) प्रक्रियेमुळे संसदेचे कामकाज एक दिवसही चालू शकले नाही. विरोधी पक्षांचे खासदार याबाबत संसदेत सतत गोंधळ घालत आहेत. आता याच SIR च्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष पुन्हा एकवटताना दिसत आहेत. बऱ्याच काळानंतर इंडिया आघाडीने काल बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व पक्ष प्रमुखांना रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले आहे. राहुल गांधींकडून या इंडिया आघाडीमध्ये जीव ओतण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अनेक विरोधी पक्ष एकवटले
SIR च्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी झाले होते. यामध्ये आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), द्रविड मुन्नेत्र कळघम द्रमुक, शिवसेना (यूबीटी), समाजवादी पार्टी (सपा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीएम), सीपीआय, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (आरएसपी), इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) या पक्षांचा समावेश होता.

भारत आघाडी एक वर्षापासून निष्क्रिय 
इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आज राहुल गांधींच्या निवासस्थानी जेवणासाठी भेटतील. उद्या म्हणजेच शुक्रवारी ते दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चाही काढणार आहेत. आघाडी एकत्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला हे समजले आहे की, विरोधी पक्षांना फक्त अशाच मुद्द्यांवर एकत्र आणता येते, जे त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहेत. अशा परिस्थितीत, SIR चा मुद्दा हा असा आहे, ज्याची सर्व विरोधी पक्षांना चिंता आहे. या मुद्द्यावर इंडिया आघाडी पुन्हा एकत्र येऊ शकते.

Web Title: INDIA Alliance: Rahul Gandhi's 'dinner diplomacy', an attempt to revive the cold INDIA alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.