२०२४ पूर्वीच 'या'२ जागांसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएची थेट लढत होणार! जाणून घ्या निवडणुकीची समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 19:58 IST2023-09-03T19:55:10+5:302023-09-03T19:58:35+5:30
देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहे, सर्वपक्षीयांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

२०२४ पूर्वीच 'या'२ जागांसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएची थेट लढत होणार! जाणून घ्या निवडणुकीची समीकरण
देशात काही महिन्यांतच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वपक्षीयांनी सुरू केली असून ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडियाची पहिली बैठक बिहारमध्ये झाली तर आता तिसरी बैठक मुंबईत झाली, विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. एनडीएनेही जोरदार तयारी केली आहे. २०२४ पूर्वी दोन राज्यांमध्ये २ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. यूपीच्या घोसी विधानसभा जागेसाठी एक पोटनिवडणूक होणार आहे, तर दुसरी पोटनिवडणूक झारखंडच्या डुमरी विधानसभेसाठी ५ सप्टेंबरला होणार आहे. ८ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही जागांवरचा निवडणूक प्रचार आता थांबला आहे. या निवडणुकांमध्ये विरोधी आघाडी इंडिया आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA यांच्यात थेट लढत होणार आहे.
ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल
उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत पहिली निवडणूक लढत समाजवादी पार्टी, इंडिया आघाडीचा घटक पक्ष आणि भाजप यांच्यात होणार आहे. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी फक्त समाजवादी पक्षाच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला नाही, तर पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवीन विरोधी एकता अंतर्गत प्रचारही करत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाला मोठा पाठिंबा नसतानाही, अरविंद केजरीवाल यांची आप देखील सपा उमेदवाराला पाठिंबा देत आहे.
भाजपकडून दारासिंग चौहान निवडणूक रिंगणात आहेत, तर सपाने सुधाकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. सुधाकर सिंह यांना काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय (एमएल)-लिबरेशनचा पाठिंबा मिळाला आहे. अखिलेश यादव यांनी गेल्या वर्षी रामपूर आणि आझमगड लोकसभा जागांसाठी इतर दोन प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकांसाठी प्रचार केला नाही, ते घोसीमध्ये प्रचार करत आहेत. ही निवडणूक देशाच्या राजकारणातील वातावरणात महत्वाची मानली जाते.