शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाढती असहिष्णुता हा बदनामीसाठी बनाव!

By admin | Updated: December 2, 2015 04:28 IST

असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील

नवी दिल्ली : असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील चर्चेचा समारोप केला. भारत हा सहिष्णू होता आणि भविष्यातही तो तसाच राहील. वाढती असहिष्णुता हा केवळ सरकारला बदनाम करण्यास रचण्यात आलेला ‘बनाव’ आहे. सामाजिक व धार्मिक समरसता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा सडेतोड इशारा गृहमंत्र्यांनी दिला. आम्ही असहिष्णू आहोत; पण ही असहिष्णुता भ्रष्टाचाराविषयी, अस्वच्छ परिसराविषयी, दहशतवादाविषयी आणि महिलांवरील अत्याचार व तत्सम विषयांबाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशात असहिष्णुतेचे सर्वांत मोठे शिकार कुणी ठरले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपा आहे, अशा शब्दांत भाषणाला सुरुवात करून राजनाथ सिंह म्हणाले, साहित्यिक, बुद्धिजीवी व कलावंतांना देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे वाटत असेल तर एकत्र बसून चर्चा होऊ शकते. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता. आम्ही कुठे चुकत असू तर ती चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ शकता.असहिष्णुतेच्या नावावर कागदी आणि बनावटी तोफगोळे डागले जात आहेत. विरोधी पक्षांचे असहिष्णुतेचे आरोप सरकारवर नाहीत तर समाज व राष्ट्रावर केलेले आरोप आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी देशात असहिष्णुतेच्या घटना घडल्या तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या का, असा सवालही राजनाथ सिंह यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)वाचाळांना संयमाचे फर्मानलोकसभेत विरोधक सरकारवर तुटून पडलेले असताना भाजपा संसदीय पक्षाची या अधिवेशनात प्रथमच बैठक झाली व त्यात चिथावणीखोर वक्तव्ये करू नका, संयम पाळा अशा सूचना पक्षाने आपल्या खासदारांना दिल्या.निषेध करणे हा राष्ट्रद्रोह; राहुल गांधींचा हल्लाअसहिष्णुतेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगल्याचा आरोप करीत, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर प्रखर टीका केली. सहिष्णुता आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. त्यामुळेच लोकांचा आवाज दडपणाऱ्या ‘असहिष्णू’ पाकिस्तानचा धडा गिरवण्याऐवजी सरकारने देशातील जनतेचा आवाज ऐकावा, असा टोला राहुल यांनी लगावला.निषेधाचे, विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जात आहे. देशातील बुद्धिजीवी, साहित्यिक देशातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करीत आहेत. आपले पुरस्कार परत करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले जात आहे. सहिष्णुता ही भारताची शक्ती आहे तर असहिष्णुता ही पाकची दुर्बलता आहे. त्यामुळेच पाकचा धडा गिरवू नका तर लोकांचा आवाज ऐका, त्यांना जवळ करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्या मताचा आदर करा. सरकार स्तरावरील विरोधाभास दिसतो आहे. कदाचित पंतप्रधानांना तो दिसत नसावा, असे राहुल म्हणाले.मोदी विदेशात जातात, संरक्षण क्षेत्रात एफडीआयच्या गोष्टी करतात; पण दादरीत हवाई दलात असलेल्या एका जवानाचा पिता मोहम्मद अखलाक मारला जातो. दोन दलित मुलांना जिवंत जाळले जाते. यावर आपले पंतप्रधान अवाक्षरही बोलत नाहीत. पंतप्रधान कौशल्य विकासाच्याही गप्पा करतात. पण एफटीआयआयचे विद्यार्थी त्यांच्यावर थोपण्यात येणाऱ्या एका व्यक्तीचा विरोध करतात, तेव्हा या कौशल्यनिपुण विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकणे पंतप्रधानांना महत्त्वाचे वाटत नाही. मोदीजी गुजरात मॉडेल आणि गुजरात शायनिंगच्याही बाता मारतात. मात्र पाटीदार आंदोलनाने गुजरातच्या विकासाचा फुगा कधीचाच फुटला आहे, असेही ते म्हणाले.विरोधकांचा सभात्यागकाँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचे राजनाथसिंह यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. गृहमंत्री देशातील घटनांवर बोलण्यापेक्षा परदेशातील उदाहरणे देत आहेत, असे सांगत काँग्रेस व अन्य सदस्यांनी सभात्याग केला.