शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाढती असहिष्णुता हा बदनामीसाठी बनाव!

By admin | Updated: December 2, 2015 04:28 IST

असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील

नवी दिल्ली : असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील चर्चेचा समारोप केला. भारत हा सहिष्णू होता आणि भविष्यातही तो तसाच राहील. वाढती असहिष्णुता हा केवळ सरकारला बदनाम करण्यास रचण्यात आलेला ‘बनाव’ आहे. सामाजिक व धार्मिक समरसता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा सडेतोड इशारा गृहमंत्र्यांनी दिला. आम्ही असहिष्णू आहोत; पण ही असहिष्णुता भ्रष्टाचाराविषयी, अस्वच्छ परिसराविषयी, दहशतवादाविषयी आणि महिलांवरील अत्याचार व तत्सम विषयांबाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशात असहिष्णुतेचे सर्वांत मोठे शिकार कुणी ठरले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपा आहे, अशा शब्दांत भाषणाला सुरुवात करून राजनाथ सिंह म्हणाले, साहित्यिक, बुद्धिजीवी व कलावंतांना देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे वाटत असेल तर एकत्र बसून चर्चा होऊ शकते. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता. आम्ही कुठे चुकत असू तर ती चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ शकता.असहिष्णुतेच्या नावावर कागदी आणि बनावटी तोफगोळे डागले जात आहेत. विरोधी पक्षांचे असहिष्णुतेचे आरोप सरकारवर नाहीत तर समाज व राष्ट्रावर केलेले आरोप आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी देशात असहिष्णुतेच्या घटना घडल्या तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या का, असा सवालही राजनाथ सिंह यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)वाचाळांना संयमाचे फर्मानलोकसभेत विरोधक सरकारवर तुटून पडलेले असताना भाजपा संसदीय पक्षाची या अधिवेशनात प्रथमच बैठक झाली व त्यात चिथावणीखोर वक्तव्ये करू नका, संयम पाळा अशा सूचना पक्षाने आपल्या खासदारांना दिल्या.निषेध करणे हा राष्ट्रद्रोह; राहुल गांधींचा हल्लाअसहिष्णुतेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगल्याचा आरोप करीत, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर प्रखर टीका केली. सहिष्णुता आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. त्यामुळेच लोकांचा आवाज दडपणाऱ्या ‘असहिष्णू’ पाकिस्तानचा धडा गिरवण्याऐवजी सरकारने देशातील जनतेचा आवाज ऐकावा, असा टोला राहुल यांनी लगावला.निषेधाचे, विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जात आहे. देशातील बुद्धिजीवी, साहित्यिक देशातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करीत आहेत. आपले पुरस्कार परत करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले जात आहे. सहिष्णुता ही भारताची शक्ती आहे तर असहिष्णुता ही पाकची दुर्बलता आहे. त्यामुळेच पाकचा धडा गिरवू नका तर लोकांचा आवाज ऐका, त्यांना जवळ करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्या मताचा आदर करा. सरकार स्तरावरील विरोधाभास दिसतो आहे. कदाचित पंतप्रधानांना तो दिसत नसावा, असे राहुल म्हणाले.मोदी विदेशात जातात, संरक्षण क्षेत्रात एफडीआयच्या गोष्टी करतात; पण दादरीत हवाई दलात असलेल्या एका जवानाचा पिता मोहम्मद अखलाक मारला जातो. दोन दलित मुलांना जिवंत जाळले जाते. यावर आपले पंतप्रधान अवाक्षरही बोलत नाहीत. पंतप्रधान कौशल्य विकासाच्याही गप्पा करतात. पण एफटीआयआयचे विद्यार्थी त्यांच्यावर थोपण्यात येणाऱ्या एका व्यक्तीचा विरोध करतात, तेव्हा या कौशल्यनिपुण विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकणे पंतप्रधानांना महत्त्वाचे वाटत नाही. मोदीजी गुजरात मॉडेल आणि गुजरात शायनिंगच्याही बाता मारतात. मात्र पाटीदार आंदोलनाने गुजरातच्या विकासाचा फुगा कधीचाच फुटला आहे, असेही ते म्हणाले.विरोधकांचा सभात्यागकाँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचे राजनाथसिंह यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. गृहमंत्री देशातील घटनांवर बोलण्यापेक्षा परदेशातील उदाहरणे देत आहेत, असे सांगत काँग्रेस व अन्य सदस्यांनी सभात्याग केला.