शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

व्यापाऱ्याच्या घरावर ईडीची पडली धाड; एकच प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 16:30 IST

उत्तर प्रदेशातील मथूरेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकून पळ काढला.

UP Crime : गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचलनायचाच्या म्हणजेच ईडीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधककांडून सत्ताधारी ईडीला कारवाई करण्यासाठी भाग पाडत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच उत्तर प्रदेशच्या मुथरामधून ईडी कारवाईची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मथुरेत एका सराफा व्यापाऱ्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. मात्र या कारवाईनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरातून पळ काढल्याची बाब समोर आली आहे. हा सगळा प्रकार व्यापाऱ्याच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे ईडीचे अधिकारी असल्याचे दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकण्याची योजना आखल्याचे समोर आलं आहे. हे बनावट अधिकारी एका सराफा व्यावसायिकाच्या घरात घुसले होते. ईडीचे अधिकारी आल्यामुळे सुरुवातीला व्यापारीही घाबरला होता. पण त्यांच्या वर्तणुकीवरुन काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. व्यापाऱ्याने आरडाओरड करुन शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर घाबरून बनावट ईडी अधिकारी व्यावसायिकाला सोडून पळून गेले. 

मथुरेतील गोविंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसानी लिंक रोड येथील राधा ऑर्किड कॉलनीत हा सगळा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी तीन पुरुष आणि एक महिला अधिकारी व्यापाऱ्याच्या घरी आले होते. त्यापैकी एक जण पोलिसांच्या गणवेशात होता. हे सर्वजण सराफा व्यापारी अश्वनी अग्रवाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी ईडीचे अधिकारी असल्याची ओळख करून दिली आणि अश्वनी अग्रवाल यांना सर्च वॉरंटही दाखवले.

अग्रवाल यांनी जेव्हा या अधिकाऱ्यांसोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांना संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला विचारले, तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यातून आला आहात? यावर त्याने तो मथुरेच्या गोविंदपुरम पोलीस ठाण्यामधून आलो आहे, असं सांगितले. इथे अग्रवाल यांचा संशय आणखी बळावला. कारण मथुरामध्ये गोविंदपुरम नावाचे पोलीस ठाणेच अस्तित्वात नाही.

त्यानंतर अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांची नजर चुकून घराबाहेर पळ काढला. त्यांनी घरासमोर राहणारे महापौर विनोद अग्रवाल यांचे घर गाठले आणि दरवाजा ठोठावला. यानंतर अग्रवाल यांनी इतर शेजाऱ्यांनाही हाक मारली आणि बाहेर आल्यावर त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती लोकांना दिली. यानंतर लोक त्यांच्या घराकडे जाऊ लागले. त्यानंतर लोकांची गर्दी वाढत असल्याचे पाहून सर्व बनावट अधिकारी घटनास्थळावरून पळून गेले.

यानंतर व्यापारी अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांनी दिलेले ईडीचे वॉरंट त्यांच्या ओळखीच्या एका अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्याला पाठवले तेव्हा त्याने ते खोटे असल्याचे म्हटले. तसेच ईडी कार्यालयातून एकही पथक तेथे पाठवण्यात आले नसल्याची माहिती दिली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाडCrime Newsगुन्हेगारी