शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

  उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत, अमित शाह यांनी घेतली PM मोदींची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 19:44 IST

Amit Shah meets PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधील भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधीलभाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. तत्पूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. ही बैठक संपल्यानंतर जे. पी. नड्डा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्यासोबत तारभर बैठक घेतली. त्याबरोबरच भूपेंद्र चौधरी यांनी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

दरम्यान, दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी आज सकाळी पक्षाचे नेते आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी या पोटनिवडणुकीसाठी सुपर ३० टीम बनवली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात नेतृत्व बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व उत्तर प्रदेशात कुठल्याही प्रकारचा नेतृत्व बदल करू इच्छित नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षनेतृत्वाने राज्यातील नेत्यांना एकजूट राहण्याची आणि निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे मागच्या महिनाभरापासून योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे. कुठलंही सरकार हे संघटनेपेक्षा मोठं असू शकत नाही, संघटनेपेक्षा कुणीही मोठं नाही, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, असं केशव प्रसाद मौर्य यांनी केलेलं विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मात्र केंद्रीय नेतृत्वाने राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह