शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जिनांसारख्या विद्वानाला पंतप्रधान बनविले असते तर...; भाजपा उमेदवाराकडून स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:24 IST

देशाच्या फाळणीला जबाबदार कोण, यावरून बरेच मतभेद आहेत. काहीजण फाळणीच्या बाजुने तर काहीजण फाळणीच्या विरोधात मते मांडत असतात.

रतलाम : काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंह सिद्धू यांना मोहम्मद अली जिनांबाबतचे वक्तव्यावरून टीका सहन करावी लागलेली असतानाच भाजपाच्या एका उमेदवाराने नेहरुंवर टीका करताना देशाच्या फाळणीवर वक्तव्य केले आहे. यामुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत. 

देशाच्या फाळणीला जबाबदार कोण, यावरून बरेच मतभेद आहेत. काहीजण फाळणीच्या बाजुने तर काहीजण फाळणीच्या विरोधात मते मांडत असतात. मात्र, बऱ्याचदा पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिनांबाबत विधाने केली जातात. यावेळी भाजपाचेरतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी नेहरुंवर टीका करताना जिनांना पंतप्रधान बनवायला हवे होते, असे वक्तव्य केले आहे. 

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जर नेहरुंनी हट्ट केला नसता तर आज देशाचे दोन तुकडे झाले नसते. मोहम्मद जिना एक वकील, एक विद्वान व्यक्ती होते. तेव्हा जर आमचा पंतप्रधान मोहम्मद अली जिनाच हवा, असा निर्णय घेतला गेला असता तर या देशाचे तुकडे झाले नसते, असे स्तुतीसुमनांचे वक्तव्य गुमानसिंह डामोर यांनी केले आहे. 

गुमानसिंह डामोर हे मध्यप्रदेशमधील भाजपाचे आमदार आहेत. त्यांनी याआधीही जम्मू काश्मीरवरून पुलवामा हल्ल्यानंतर वक्तव्ये केली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जर शांतता हवी असेल तर अशांत जिल्ह्यांचे वेगळे राज्य बनविण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्या राज्यात केवळ चार जिल्हे अशांत आहेत. यामुळे या चार जिल्ह्यांना वेगळे करावे. जम्मू आणि लडाखचे क्षेत्र शांत आहे. वेगळे केल्यास तेथील अशांततेशी चार हात करता येतील, असे ते म्हणाले होते. यावरच ते थांबले नाहीत तर मध्य प्रदेशपासून छत्तीसगड वेगळे केल्याचे उदाहरणही त्यांनी तेव्हा दिले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBJPभाजपाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसIndiaभारतratlam-pcरतलामLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक