शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रेशन दुकानदार मोफत धान्य देत नसल्यास 'या' टोल फ्री नंबरवर करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 14:35 IST

स्वस्त धान्य दुकानधारकांकडून रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. या काळ्या बाजारातून धान्याची खरेदी-विक्री होत असल्याने गरिबांना कमी धान्य दिले जाते किंवा दिलेच जात नाही, असे प्रकार उघडकीस येत आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण योजनेंतर्गत लॉकडाऊन काळात ही मोफत धान्य योजना सुरु केली आहे. ज्या गरिब कुटुंबीयांकडे रेशनकार्ड नाही, अशांनाही रेशनचे धान्य देण्याचे सरकारने बजावले आहे

नवी दिल्ली - कोविड या संसर्गजन्य आजाराचामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. दरम्यान या संसर्गजन्य आजारांच्या काळात कोणत्याही व्यक्तीची उपासमार होवू नये म्हणून गोरगरिबांना  केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्डवरील प्रति व्यक्तीस 5 किलो अन्न धान्य वितरण केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत गरिबांना हे मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी गरिबांची स्वस्त धान्य दुकानदारांकडून पिळवणूक होत आहे. कार्डधारकांना धान्य मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. 

स्वस्त धान्य दुकानधारकांकडून रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. या काळ्या बाजारातून धान्याची खरेदी-विक्री होत असल्याने गरिबांना कमी धान्य दिले जाते किंवा दिलेच जात नाही, असे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे, कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येत नसेल तर संबधित जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्यात यावी. तसेच, राज्य पुरवठा आणि नियंत्रण कक्षाकडेही धान्य दुकानदाराची तक्रार करता येऊ शकते. त्यासाठी, सरकारने टोल फ्री नंबर जारी केला आहे. 1800-180-2087, 1800-212-5512 आणि 1967 या नंबरवर फोन करुन तुम्ही संबंधित दुकानदाराची तक्रार देऊ शकता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण योजनेंतर्गत लॉकडाऊन काळात ही मोफत धान्य योजना सुरु केली आहे. ज्या गरिब कुटुंबीयांकडे रेशनकार्ड नाही, अशांनाही रेशनचे धान्य देण्याचे सरकारने बजावले आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून नोव्हेंबर 2020 पर्यंत हे मोफत धान्य देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अद्यापही गरिबांना धान्य मिळत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात स्पर्शापासून लांब राहणे महत्त्वाचे आहे, पण रेशन धान्य दुकानात हाताचा अंगठा घेऊनच ऑनलाईन पद्धतीने रेशन दिले जात आहे. यातून कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने नुसत्या रेशन काडार्वर धान्य द्यावे, अशी मागणी कार्डधारकांकडून होत आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग