शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

मोदीविरोधी नाही, प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय पण गरज असेल तेव्हा सत्य बोलणारच - प्रकाश राज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 12:33 PM

मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते...  मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत...मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय

ठळक मुद्देदेशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होतेमी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच

बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदींवर टिप्पणी केल्याप्रकरणी  त्यांच्याविरोधात एका वकिलाने या प्रकरणी लखनऊ कोर्टात तक्रार देखील केली आहे. प्रकाश राज यांनी खडेबोल सुनावल्यापासून त्यांना सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पण त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. मी मोदीविरोधी नाहीये. पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच, तो माझा हक्क आहे असं रोखठोक वक्तव्य त्यांनी ते द हिंदूला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये केलं आहे. चुकीच्या गोष्टींबाबत बोलल्यास मला मोदीविरोधी म्हणण्याची हिम्मत कशी होऊ शकते असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

'ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे. आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोकं आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?' पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'असं प्रकाश राज म्हणाले होते. 

देशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते...  मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत... काही मुद्यांवर माझे त्यांच्याशी मतभेद आहेत.... मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच असं प्रकाश राज म्हणाले आहेत. 

(फोटो सौजन्य - The Hindu)

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदी