शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

...तेव्हा भारतासमोर मैत्रीचा हात पुढे करेन- इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 07:48 IST

बिघडलेल्या संबंधांचं खापर खान यांनी भारतावर फोडलं

इस्लामाबाद: भारतात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करेन, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. सध्या भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा महत्त्वाचा असल्यानं मोदी सरकारनं आमचा मैत्रीचा प्रस्ताव फेटाळला आहे, असं खान म्हणाले. रियाधमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट एनिशिएटिव्ह फोरममध्ये ते बोलत होते. पाकिस्तानला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असं इम्रान खान यांनी म्हटलं. 'आम्हाला भारत आणि अफगाणिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा कमी होईल आणि मानवी संसाधनांचा वापर विकासासाठी करता येईल,' असा इरादा त्यांनी बोलून दाखवला. पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबतही चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. अफगाणिस्तानात शांतता असल्यास द्विपक्षीय संबंध सुधारतील. यामुळे व्यापार वाढेल. सोबतच मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होईल, असं इम्रान खान यांनी म्हटलं. मी पंतप्रधान होताच भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र भारतानं त्याला प्रतिसाद दिला नाही, असं म्हणत खान यांनी दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांचं खापर भारतावर फोडलं. इम्रान खान ऑगस्टमध्ये सत्तेवर आले. त्यानंतर लगेचच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. भारतानं याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे भारतानं परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९lok sabhaलोकसभा