शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

मी नाही म्हणालो म्हणून मोदी मुख्यमंत्री बनले; तोगडियांचे मोठे गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 21:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नाही तर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मनातून उतरले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांचे एकेकाळचे जवळचे मित्र समजले जाणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले. गुजरातमध्ये सर्व आमदारांनी 2001 मध्ये मला मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी त्यांना हात जोडून नाही म्हटल्याचे तोगडीया यांनी सांगितले. तसेच त्यांनी मोदी यांच्यासोबतच्या मतभेदांवरही भाष्य केले. 

एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींसोबतच्या वादावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नाही तर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मनातून उतरले. कारण त्यांनी कोणतीच विकासकामे केली नाहीत. मोठमोठी आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. बेरोजगारी, नोटबंदी, सीबीआयसारख्या संस्थांवर बंधने लादून देशात अघोषित आणीबाणी लागू केली. यामुळे अयोध्येच्या मार्गावर एकत्र निघालेले मोदींनी लोकांना फसविल्याचा आरोप त्यांनी केला. 

10 वर्षांचा असताना आपण हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. संघ, मोदी आणि मी तिघांनीही अयोध्येतील राम मंदिरासाठी आश्वासने दिली होती. मात्र, त्यांना राम केवळ निवडणुकीपुरताच दिसतो. शेतकरीही त्यांना निवडणुकीपुरताच हवा. ते त्यांच्या आईलाही रांगेत उभे करतात. साध्वी प्रज्ञा सिंहदेखील निवडणुकीपुरतीच आहे, असा आरोप त्यांनी केला. 

साध्वी प्रज्ञासिंहने करकरेंविषयी केलेले वक्तव्य चुकीचे होते. जवळपास 60 हजार पोलिसांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यामुळेच आम्ही घरामध्ये सुरक्षित राहतो. मुली सुरक्षित फिरू शकतात. यामुळे साध्वीचे वक्तव्याची निंदा करतो, असे तोगडीया म्हणाले.  

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा