शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

... "तेव्हा मी मुंडन करुन अयोध्येतून पळाले होते"; उमा भारतींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 19:45 IST

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीतील प्राणप्रतिष्ठा सोहहळ्याची चर्चा आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी हा भव्य-दिव्य सोहळा होत असून देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यानिमित्ताने रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतलेल्या, रामजन्मभूमीत आंदोलनासाठी अयोध्येत जाऊन कारसेवा केलेल्या बहुतांश कारसेवकांना अयोध्येचं निमंत्रण दिलं जात आहे. अयोध्येतील या कारसेवेत मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही योगदान दिलं होतं. त्याच, अनुषंगाने त्यांनी कारसेवेतील काही आठवणी जागवल्या आहेत. 

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात, रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपा नेत्या उमा भारती यांचाही आंदोलनात सक्रीय सहभाग होता. विशेष म्हणजे या आंदोलनातील सहभागावेळी आपण शहीद होतो की काय, असे प्रसंगही तीनवेळा घडल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

मला रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र येथून फोन आला होता, तुम्ही २२ ऐवजी १८ जानेवारीलाच अयोध्येला या. त्यामुळे, मी अयोध्येत १८ जानेवारीपासूनच असणार आहे. मी १२ वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहात होते. रामचंद्रास परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती. तेव्हा, बंद कुलूपात रामलला होते, केवळ पुजेसाठी ते कुलूप उघडले जात. हिंदू समाजाचा हा केवढा अपमान आहे, अशी भावना त्यावेळी माझ्या मनी होती. 

तेव्हापासूनच मी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो. आमच्यासोबत मिश्रा, वसुंधरा आणि मेहता हेही होते. एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तेथे ठेवले होते. मात्र, मी डोक्याचं मुंडन करुन, वेश बदलून तेथून पळून गेले होते, अशी आठवण आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपला सहभाग उमा भारती यांनी स्पष्ट केला. 

२ नोव्हेंबर रोजीची कारसेवा सर्वात विशेष मानली जाते. त्यावेळी, एका समुहाचं नेतृत्त्व मला दिले होते, आमच्या सर्वांवर भीषण लाठीचार्ज झाला होता, गोळीबारही करण्यात आला होता. ज्यामध्ये, प्रा. अरोडा आणि राम व शरद कोठारी यांचा मृत्यू झाला होता. या कारसेवेत मोठा हिंसाचार झाला होता. एक धाडसाचं आणि शालिनतेचं प्रदर्शन होतं. त्यानंतर, ६ डिसेंबर रोजीची कारसेवा घडली. त्या आंदोलनातही मी सहभागी होते, अशी आठवण सांगताना ६ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचा वृत्तांतही उमा भारती यांनी सांगितला. तसेच, यावेळी मी या आंदोलनात मृत्यूमुखी पडते, किंवा शहीद होते की काय, असेही वाटल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा