शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलाने देशासाठी दिले बलिदान याचा मला अभिमान! काश्मीरमध्ये शहीद कॅप्टन बृजेश थापा यांच्या मात्या-पित्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 05:05 IST

बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.

जम्मू : माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा मला अभिमान वाटतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे उद्गार शहीद बृजेश थापा यांची आई नीलिमा थापा यांनी मंगळवारी काढले. बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.

नीलिमा थापा म्हणाल्या की, आम्ही आमचा पुत्र गमावला आहे. तो आता परत येणार नाही. तो अतिशय मनमिळाऊ होता. तू नौदल किंवा हवाई दलात जा असे त्याला आम्ही सांगितले होते; पण त्याला भूदलातच जायचे होते. बृजेश थापा यांचे वडील भुवनेश हे भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल आहेत. त्यांनी सांगितले की, मुलाला लष्करात जायचे होते. त्याने लहानपणापासून हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याने लष्करात जाण्यासाठी सर्व परीक्षा दिल्या व तो पहिल्याच फटक्यात उत्तीर्ण झाला.

‘काही घडलेच नाही हा थाट’

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, शहीद जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेल्या ३६ दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जणूकाही घडलेच नाही या थाटात मोदी सरकार वागत आहे.

दहशतवाद निपटून काढणार : सरकार

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, काश्मीरमधून दहशतवाद निपटून काढण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

महासंचालकांना बडतर्फ करा : मुफ्ती

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, काश्मीरमध्ये गेल्या ३२ महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांत ५० जवान शहीद झाले. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांना बडतर्फ करण्यात यावे.

केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी :  राहुल गांधी

चकमकीत चार जवान शहीद झाले त्याबद्दल काँग्रेसने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटींची जबाबदारी मोदी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात सरकारने अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे. भाजपच्या चुकीच्या धोरणांची फळे लष्करातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांना भोगावी लागत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर