शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुला-मुलीच्या हत्येनंतर पती-पत्नीची आत्महत्या; व्यावसायिक भागीदार महिलाही मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 18:03 IST

झियाबादमधील कृष्णा सोसायटी पाच जणांच्या मृत्यूमुळे हादरली.

नवी दिल्ली: गाझियाबादमधील कृष्णा सोसायटी पाच जणांच्या मृत्यूमुळे हादरली. पती-पत्नीने आपल्या दोन किशोरवयीन मुलांना विष देऊन स्वत: आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. व्यावसायिक भागीदार असलेल्या महिलेनेदेखील त्यांच्यासमवेत आत्महत्या केल्याने पोलीस चक्रावले आहेत. गुलशन (४५) त्यांची पत्नी परवीन (४३) व संजना (३८) यांनी मंगळवारी पहाटे कृष्णा सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. घरातच गुलशन व त्याच्या पत्नीने सोमवारी मध्यरात्री मुलगा ऋत्विक (१७) व मुलगी ऋत्विका (१८) यांना विषाचे इंजेक्शन दिले. पहाटे दोघांनी संजनासमवेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस आयुक्त मनीष मिश्रा यांनी दिली. संजना गुलशनची व्यावसायिक भागिदार होती. एकाचवेळी पाचही जणांचे मृतदेह आवारात ठेवल्याने संपूर्ण सोसायटीतीली लोक सुन्न झाले.

गुलशन यांनी घरी ससा पाळला होता. ससाही मृतावस्थेत आढळला. सशाचा मृत्यूदेखील विषामुळेच झाल्याचा दावा पोलिसांनी केला. संजना गुलशनची व्यावसायिक भागीदार होती. व्यवसायात सतत होणा-या नुकसानामुळे पत्नीचे गुलशनशी सतत खटके उडायचे. त्यांच्यात वाद होत असत. पोलीस घराची कसून चौकशी करीत आहेत. अनेक वस्तू फॉरेंसिक विभागाला पाठवण्यात येतील. व्यावसायिक नुकसान हेच कारण सध्या समोर दिसत असले तरी पूर्ण तपास झाल्यावरच ठामपणे सांगू, अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.  गुलशन व परवीन यांचा जागीच अंत झाला होता तर संजना तेव्हा विव्हळत होती. पोलिसांनी तातडीने संजना यांना रुग्णालयात नेले. दोन तासांनी संजनाचाही मृत्यू झाला.  

घरात पोलिसांना घरी चिठ्ठी सापडली. त्यात राकेश वर्मा यांचे नाव आहे. राकेश वर्मा परवीन यांचे मेहुणे आहेत. गुलशन यांनीच ती चिठ्ठी लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दु:खद बाब म्हणजे भिंतीवर ५००च्या नोटा गुलशन यांनी चिकटवल्या होत्या. अंत्यविधीसाठी हे पैसे वापरावे, असा उल्लेख त्यात आहे. गुलशन यांना व्यवसायात मोठा तोटा झाला. तो भरून निघत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची स्थिती खालावत होती. शालिमार गार्डनसारख्या उच्चभ्रू भागातून याच ऑक्टोबरमध्ये इंदिरापूरममध्ये राहण्यास आले होते. गुलशन यांनी लोकांना दिलेले अनेक चेक बाऊन्स झाले होते. त्यातील काही गुलशन यांनी भिंतीवर चिकटवले. महत्त्वाची बाब म्हणजे राकेश शर्मा यांना केस बाऊन्सप्रकरणी तुरुंगवासही झाला आहे. गुलशनला वडिलांच्या संपत्तीतून दोन कोटी रुपये मिळाले. हे सर्व पैसे गुलशन यांनी राकेश वर्मांसमवेत व्यवसायात गुंतवले. व्यवसायात मोठा तोटा झाला. मुद्दलही गेली, उलट व्याज वाढले. लोकांची देणी वाढली. गुलशन कुमार यांनी परतफेडीसाठी चेक दिले होते. ते वारंवार बाउन्स होऊ लागले. गुलशन यांच्या घरी सापडलेले बाऊन्स चेक तब्बल एक कोटी रुपयांचे आहेत.