शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

शहरांत वाहनांची अफाट गर्दी, अपघात मात्र गावाकडे अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:39 IST

२०२१ मध्ये शहरी भागात ३७ टक्के तर ग्रामीण भागात ६३ टक्के नोंद

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरी भागांमध्ये लोकसंख्येची घनता, वाहनांची गर्दी अधिक असतानाही ग्रामीण भागांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२१ मध्ये शहरी भागात १ लाख ५२ हजार (३७ टक्के), तर ग्रामीण भागात २ लाख ६० हजार अपघातांची (६३ टक्के) नोंद झाली आहे. याचवेळी शहरी भागात अपघातात ४७ हजार जणांचा मृत्यू झाला असून, ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण दुप्पट म्हणजे १ लाख ६ हजार इतके अधिक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

अपघात आणि मृत्यू कुठे वाढले?

२०१५ पासूनची आकडेवारी पाहिल्यास शहरी भागात घडणारे अपघात, मृत्यू आणि जखमी होणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. ही सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अपघातांचे, मृत्यूंचे आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यांत?

राज्य    शहर    ग्रामीण

  • उत्तर प्रदेश    ७७९२    ११२३४ 
  • तामिळनाडू    ३७४७    ११००० 
  • महाराष्ट्र    ३४८६    ९०६८ 
  • मध्य प्रदेश    ३१४५    ७६६१ 
  • तेलंगणा    २७२६    ४३५४

 

५३५२ - ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट असून, तिथे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

वाहनांच्या सुरक्षेसाठी काय?

  • एअरबॅग्ज
  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर
  • ॲन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस)
  • कम्बाइन्ड ब्रेकिंग प्रणाली (सीबीएस)
  • सीट बेल्ट रिमाईंडर
  • ओव्हर स्पिड इशारा प्रणाली
  • मुले बाईकवर असल्यास वेगमर्यादा ४० किमी प्रति तास

 

मंत्रालय काय करतेय?

रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यासाठी प्रचार आणि जनजागृती मोहीम, रस्ता सुरक्षा अभियान आणि अभियांत्रिकी पातळीवरही प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात असे ब्लॅक स्पॉट शोधून तेथे उपाय केले जात आहेत. वाहतूक नियम पाळण्यासाठी नियम मोडल्यास दंडाची रक्कमही प्रचंड वाढविण्यात आली आहे.

शहरात तत्काळ उपचार

अहवालानुसार, शहरी भागात अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचारांच्या सुविधा मिळतात; मात्र ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अतिशय कमी असल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत. परिणामी शहरांच्या तुलनेत अपघातांमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे.

टॅग्स :Accidentअपघात