शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

शहरांत वाहनांची अफाट गर्दी, अपघात मात्र गावाकडे अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:39 IST

२०२१ मध्ये शहरी भागात ३७ टक्के तर ग्रामीण भागात ६३ टक्के नोंद

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरी भागांमध्ये लोकसंख्येची घनता, वाहनांची गर्दी अधिक असतानाही ग्रामीण भागांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२१ मध्ये शहरी भागात १ लाख ५२ हजार (३७ टक्के), तर ग्रामीण भागात २ लाख ६० हजार अपघातांची (६३ टक्के) नोंद झाली आहे. याचवेळी शहरी भागात अपघातात ४७ हजार जणांचा मृत्यू झाला असून, ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण दुप्पट म्हणजे १ लाख ६ हजार इतके अधिक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

अपघात आणि मृत्यू कुठे वाढले?

२०१५ पासूनची आकडेवारी पाहिल्यास शहरी भागात घडणारे अपघात, मृत्यू आणि जखमी होणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. ही सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अपघातांचे, मृत्यूंचे आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यांत?

राज्य    शहर    ग्रामीण

  • उत्तर प्रदेश    ७७९२    ११२३४ 
  • तामिळनाडू    ३७४७    ११००० 
  • महाराष्ट्र    ३४८६    ९०६८ 
  • मध्य प्रदेश    ३१४५    ७६६१ 
  • तेलंगणा    २७२६    ४३५४

 

५३५२ - ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट असून, तिथे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

वाहनांच्या सुरक्षेसाठी काय?

  • एअरबॅग्ज
  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर
  • ॲन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस)
  • कम्बाइन्ड ब्रेकिंग प्रणाली (सीबीएस)
  • सीट बेल्ट रिमाईंडर
  • ओव्हर स्पिड इशारा प्रणाली
  • मुले बाईकवर असल्यास वेगमर्यादा ४० किमी प्रति तास

 

मंत्रालय काय करतेय?

रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यासाठी प्रचार आणि जनजागृती मोहीम, रस्ता सुरक्षा अभियान आणि अभियांत्रिकी पातळीवरही प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात असे ब्लॅक स्पॉट शोधून तेथे उपाय केले जात आहेत. वाहतूक नियम पाळण्यासाठी नियम मोडल्यास दंडाची रक्कमही प्रचंड वाढविण्यात आली आहे.

शहरात तत्काळ उपचार

अहवालानुसार, शहरी भागात अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचारांच्या सुविधा मिळतात; मात्र ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अतिशय कमी असल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत. परिणामी शहरांच्या तुलनेत अपघातांमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे.

टॅग्स :Accidentअपघात