शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शहरांत वाहनांची अफाट गर्दी, अपघात मात्र गावाकडे अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:39 IST

२०२१ मध्ये शहरी भागात ३७ टक्के तर ग्रामीण भागात ६३ टक्के नोंद

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरी भागांमध्ये लोकसंख्येची घनता, वाहनांची गर्दी अधिक असतानाही ग्रामीण भागांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२१ मध्ये शहरी भागात १ लाख ५२ हजार (३७ टक्के), तर ग्रामीण भागात २ लाख ६० हजार अपघातांची (६३ टक्के) नोंद झाली आहे. याचवेळी शहरी भागात अपघातात ४७ हजार जणांचा मृत्यू झाला असून, ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण दुप्पट म्हणजे १ लाख ६ हजार इतके अधिक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

अपघात आणि मृत्यू कुठे वाढले?

२०१५ पासूनची आकडेवारी पाहिल्यास शहरी भागात घडणारे अपघात, मृत्यू आणि जखमी होणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. ही सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अपघातांचे, मृत्यूंचे आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यांत?

राज्य    शहर    ग्रामीण

  • उत्तर प्रदेश    ७७९२    ११२३४ 
  • तामिळनाडू    ३७४७    ११००० 
  • महाराष्ट्र    ३४८६    ९०६८ 
  • मध्य प्रदेश    ३१४५    ७६६१ 
  • तेलंगणा    २७२६    ४३५४

 

५३५२ - ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट असून, तिथे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

वाहनांच्या सुरक्षेसाठी काय?

  • एअरबॅग्ज
  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर
  • ॲन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस)
  • कम्बाइन्ड ब्रेकिंग प्रणाली (सीबीएस)
  • सीट बेल्ट रिमाईंडर
  • ओव्हर स्पिड इशारा प्रणाली
  • मुले बाईकवर असल्यास वेगमर्यादा ४० किमी प्रति तास

 

मंत्रालय काय करतेय?

रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यासाठी प्रचार आणि जनजागृती मोहीम, रस्ता सुरक्षा अभियान आणि अभियांत्रिकी पातळीवरही प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात असे ब्लॅक स्पॉट शोधून तेथे उपाय केले जात आहेत. वाहतूक नियम पाळण्यासाठी नियम मोडल्यास दंडाची रक्कमही प्रचंड वाढविण्यात आली आहे.

शहरात तत्काळ उपचार

अहवालानुसार, शहरी भागात अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचारांच्या सुविधा मिळतात; मात्र ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अतिशय कमी असल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत. परिणामी शहरांच्या तुलनेत अपघातांमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे.

टॅग्स :Accidentअपघात