शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अयोध्या होती कशी, होणार कशी?; जमिनींना सोन्याचा भाव, विकासाचा रामब्रँड

By यदू जोशी | Updated: January 21, 2024 11:25 IST

अरुंद गल्ल्या, घाणीचे साम्राज्य, दाटीवाटीने वसलेली घरे, रस्त्यांपासून इतर नागरी सुविधांची वानवा असे अयोध्येचे बकाल चित्र परवापर्यंत होते.

- यदु जोशी

आता अयाेध्येचा मेकओव्हर हाेत आहे. आतापर्यंत या शहराची अर्थव्यवस्था या शहरातील लोकांच्या हाती होती, पण आता जी नवीन अयोध्या उभी राहत आहे, तिची अर्थव्यवस्थाही आपल्याच हातात ठेवणे येथील मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांच्या हाताबाहेरचे आहे.

अरुंद गल्ल्या, घाणीचे साम्राज्य, दाटीवाटीने वसलेली घरे, रस्त्यांपासून इतर नागरी सुविधांची वानवा असे अयोध्येचे बकाल चित्र परवापर्यंत होते. प्रभू श्रीरामांना पुन्हा जन्म घ्यावासा वाटला तर अशा अयोध्येकडे पाहून ते दुसरीकडे जातील अशी टीका केली जायची. अस्वच्छ छोटी छोटी हाॅटेल्स, अतिक्रमण करून रस्त्यापर्यंत आलेले दुकानदार, त्यातून होणारी वाहतुकीची कोंडी, या सगळ्यातून मार्ग काढत रामलल्लांच्या दर्शनासाठी जाणारा देशभरातील भाविक ही आम परिस्थिती होती. आता भव्यदिव्य राम मंदिराच्या निमित्ताने अयोध्येचा मेकओव्हर होणारच आहे, पण वर्षानुवर्षे अस्वच्छतेत रमलेली माणसे बदलणार आहेत का हा लाखमोलाचा प्रश्न आहे. 

स्वत:ला बदलण्याची तयारी अयोध्यावासियांनी केल्याचे तेथील लोकांशी बोलताना जाणवते. उत्तर प्रदेशातील माणूस गरीब आहे, साधा आहे पण चाणाक्ष आहे. आपले यापुढचे विश्व कसकसे बदलणार आहे याचा अंदाज त्याला आलाय अन् त्या दृष्टीने स्वत:ला बदलण्याची तयारीही त्याने केली आहे. आतापर्यंत या शहराची अर्थव्यवस्था या शहरातील लोकांच्या हाती होती, पण आता जी नवीन अयोध्या उभी राहत आहे तिची अर्थव्यवस्थाही आपल्याच हातात ठेवणे येथील मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांच्या हाताबाहेरचे आहे. 

इथे आता बिग प्लेअर्स येऊ पाहत आहेत. मोठमोठ्या ब्रँडच्या शो रुम्स, खाद्य पदार्थांचे जगभरातील लोकप्रिय जॉईंट्स दारावर येऊन ठेपले आहेत. अशावेळी स्थानिक किरकोळ व्यापारी कसे टिकतील हा प्रश्न आहेच, पण छोटेखानी हॉटेल चालविणारे शरद पांडे यांनी त्याचे लाजवाब उत्तर दिले. कितीही मोठ्या गोष्टी येऊ देत सामान्य गोरगरीब भक्त तिथे जाणार थोडीच? ते तर आमच्याकडेच येतील ना? एक सांगू, रामलल्लांना सगळ्यांची काळजी आहे. गरीब ते अतिश्रीमंत असे सर्वच प्रकारचे भक्त इथे येणार आहेत. ५० हजार रुपये प्रति दवस रेटच्या खोल्या असलेले हॉटेल अन् एक हजार रुपये रोजाचे हॉटेल दोन्ही हाऊसफुल्ल राहतील, असे पांडे सांगतात. राम मंदिराकडे केवळ धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहता येणार नाही. दरवर्षी दोन कोटी भाविक या ठिकाणी येतील. त्यातून पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. म्हणूनच राम मंदिरासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्या ठिकाणी भव्य इस्पितळ उभारायला हवे होते असा तर्क देणाऱ्यांची इथे फिरल्यानंतर कीव करावीशी वाटते. 

विकासाचा रामब्रँड

नागपूरचे एक गृहस्थ रामलखन तिवारी मूळचे उत्तर प्रदेशचे. मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच नागपुरातील आपली सारी संपत्ती विकून ते अयोध्येत स्थिरावले आहेत. आता स्वत:चे हॉटेल उभारत आहेत. रस्ता रुंदीकरणापासून अनेक विकासकामांसाठी येथील नागरिकांना जागा द्यावी लागली, मोबदला मिळाला. कोणीही विरोध केला नाही. कारण, आपली थोडी जागा गेली तरी त्या मोबदल्यात भविष्यात आपल्याला आणि आपल्यानंतरच्या पिढ्यांना काय मिळणार हे या लोकांना ठाऊक आहे.त्यातूनच अनेकांचे पाय आपल्या जन्मभूमीकडे पुन्हा वळले आहेत. धार्मिकतेबरोबरच विकासाचा रामब्रँड सगळ्यांनी ओळखला आहे, असे रामलखन तिवारी म्हणाले.

जमिनींना सोन्याचा भाव 

अयोध्या व परिसरातील जमिनींना आता सोन्याचा भाव आला आहे. काही भूमाफिया सक्रिय झाले आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या ठिकाणी पाच बोटांत सहा अंगठ्या अन् गळ्यात सोन्याचे जाड गोफ घालणारे असे माफिया दिसतात. अयोध्येतही तसे चित्र दिसते. अर्थात माफियांचा बंदोबस्त योगी आदित्यनाथ बरोबर करतील आणि अशा प्रवृत्ती इथे फोफावणार नाहीत असे लोक विश्वासाने बोलून दाखवतात.

मठांचेही रूपडे पालटावेसंत-महंतांचे आखाडे म्हणजे आश्रम हे एक वेगळे आकर्षण आणि भक्तिकेंद्र आहेत. या मठांचे भक्त जगभर आहेत. राम मंदिराच्या भोवती केंद्रित होऊ पाहत असलेला सध्याचा विकास आपल्या मठांचे महत्त्व कमी तर करणार नाही ना अशी भीती मठाधीशांना वाटते. आता राम मंदिराच्या भव्यदिव्यतेसमोर आपले मठ झाकोळतील असे त्यांना वाटत आहे. आपल्या मठांचे व आसपासच्या भागाचे रुपडेही राज्य सरकारने पालटावे अशी त्यांची भावना आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या