शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेचे प्रदूषण कसे थांबवाल

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर : नागपूर व इतर शहरांतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे वैनगंगा नदी व गोसेखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. यासंदर्भात शासन व नागपूर महानगरपालिका काय उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

नागपूर : नागपूर व इतर शहरांतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे वैनगंगा नदी व गोसेखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. यासंदर्भात शासन व नागपूर महानगरपालिका काय उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
याप्रकरणी तीन जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. गोसेखुर्द धरणाची दारे उघडून पाणी वाहून जाऊ द्यावे. यामुळे पाण्याची पातळी कमी होऊन बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे नुकसान होणार नाही. धरणातील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याने ते पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी वापरू शकत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिज्ञापत्र सादर करून धरणाचे पाणी प्रदूषित असल्याचे मान्य केले आहे. पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे काय हे ठरविण्यासाठी किमान पाच चाचण्या करणे आवश्यक असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.