शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

इलेक्टोरल बाँड्समधून आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:24 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडबाबत मोठा निर्णय दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडबाबत मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित करून त्यावर बंदी घातली आहे. निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षापासून इलेक्टोरल बाँड्समधून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. सर्वाच्च न्यायालयाने २०१९ नंतर इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोणी किती आणि कोणाला देणगी दिली याचा तपशील सार्वजनिक करण्यास सांगितले आहे.

इलेक्टोरल बाँड्स आता RTIच्या कक्षेत; राजकीय पक्षांना निधीची माहिती द्यावी लागणार- सुप्रीम कोर्ट

आगामी लोकसभा आणि इतर निवडणुकांवरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो कारण राजकीय पक्षांच्या भविष्यातील निधीवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. इलेक्टोरल बाँड्स योजना लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. भाजप आणि इतर पक्षांच्या देणगीमध्ये माठा फरक असल्याचे दिसत आहे.

इलेक्टोरल बाँड्समधून कोणाला किती निधी मिळाला?

एडीआरच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक रोखे लागू केल्यानंतर, पुढील पाच वर्षांत, राजकीय पक्षांना बाँडद्वारे मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी ५७ टक्के, म्हणजेच निम्म्याहून अधिक रक्कम भारतीय पक्षाच्या निधीत आली. 

आर्थिक वर्ष २०१७ ते २०२१ दरम्यान, राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे ९ हजार १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली. ही देणगी ७ राष्ट्रीय पक्ष आणि २४ प्रादेशिक पक्षांकडून आली आहे.

या पाच वर्षांत भाजपला इलेक्टोरल बाँड्समधून ५,२७२ कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेस पक्षाला याच काळात ९५२ कोटी रुपये मिळाले. तर उर्वरित सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या देणग्या २९ राजकीय पक्षांना मिळालेल्या आहेत. पाच वर्षांत निवडणूक रोख्यांसाठी भाजपला एकूण देणग्यांपैकी ५७ टक्के देणग्या मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ १० टक्के देणग्या मिळाल्या आहेत.

या यादीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पाच वर्षांत टीएमसीला निवडणूक रोख्यांमधून सुमारे ७६८ कोटी रुपये मिळाले. या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त बीजेडी, द्रमुक, एनसीपी, आप, जेडीयू या पक्षांच्या देणग्यांचा वाटा पहिल्या १० मध्ये होता.

नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षाला २०१७ ते २०२१ या आर्थिक वर्षात किमान ६२२ कोटी रुपये, डीएमकेला ४३२ कोटी रुपये, एनसीपीला ५१ कोटी रुपये, 'आप'ला ४४ कोटी रुपये आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला सुमारे २४ कोटी रुपये मिळाले. बाँडद्वारे मिळाले.

CPI, CPM, BSP आणि मेघालयातील सत्ताधारी पक्ष NPP हे असे राजकीय पक्ष होते या पक्षांना २०१७ ते २०२१ या कालावधीत निवडणूक रोख्यांमधून कोणतीही निवडणूक देणगी मिळाली नाही.

२०२२-२३ या वर्षात किती निधी मिळाला?

मार्च २०२२-२३ दरम्यान एकूण २,८०० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकले. या संपूर्ण रकमेपैकी सुमारे ४६ टक्के रक्कम भारतीय जनता पक्षाच्या खात्यात आली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पक्षाने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १,२९४ कोटी रुपये मिळाले.

काँग्रेसला २०२२-२३ मध्ये पक्ष निधीमध्ये फक्त १७१ कोटी रुपये मिळाले. गेल्या आर्थिक वर्षात निवडणूक रोख्यांद्वारे २३६ कोटी रुपये मिळाले होते.२०२१-२२ मध्ये भाजपचे उत्पन्न  १,९१७ कोटी रुपये होते, ते २०२२-२३ मध्ये वाढून २,३६१ कोटी रुपये झाले. दुसरीकडे, काँग्रेसचे एकूण उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात ४५२ कोटी रुपये होते जे २०२१-२२ मध्ये ५४१ कोटी रुपये होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस