शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्टोरल बाँड्समधून आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:24 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडबाबत मोठा निर्णय दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडबाबत मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित करून त्यावर बंदी घातली आहे. निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षापासून इलेक्टोरल बाँड्समधून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. सर्वाच्च न्यायालयाने २०१९ नंतर इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोणी किती आणि कोणाला देणगी दिली याचा तपशील सार्वजनिक करण्यास सांगितले आहे.

इलेक्टोरल बाँड्स आता RTIच्या कक्षेत; राजकीय पक्षांना निधीची माहिती द्यावी लागणार- सुप्रीम कोर्ट

आगामी लोकसभा आणि इतर निवडणुकांवरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो कारण राजकीय पक्षांच्या भविष्यातील निधीवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. इलेक्टोरल बाँड्स योजना लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. भाजप आणि इतर पक्षांच्या देणगीमध्ये माठा फरक असल्याचे दिसत आहे.

इलेक्टोरल बाँड्समधून कोणाला किती निधी मिळाला?

एडीआरच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक रोखे लागू केल्यानंतर, पुढील पाच वर्षांत, राजकीय पक्षांना बाँडद्वारे मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी ५७ टक्के, म्हणजेच निम्म्याहून अधिक रक्कम भारतीय पक्षाच्या निधीत आली. 

आर्थिक वर्ष २०१७ ते २०२१ दरम्यान, राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे ९ हजार १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली. ही देणगी ७ राष्ट्रीय पक्ष आणि २४ प्रादेशिक पक्षांकडून आली आहे.

या पाच वर्षांत भाजपला इलेक्टोरल बाँड्समधून ५,२७२ कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेस पक्षाला याच काळात ९५२ कोटी रुपये मिळाले. तर उर्वरित सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या देणग्या २९ राजकीय पक्षांना मिळालेल्या आहेत. पाच वर्षांत निवडणूक रोख्यांसाठी भाजपला एकूण देणग्यांपैकी ५७ टक्के देणग्या मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ १० टक्के देणग्या मिळाल्या आहेत.

या यादीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पाच वर्षांत टीएमसीला निवडणूक रोख्यांमधून सुमारे ७६८ कोटी रुपये मिळाले. या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त बीजेडी, द्रमुक, एनसीपी, आप, जेडीयू या पक्षांच्या देणग्यांचा वाटा पहिल्या १० मध्ये होता.

नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षाला २०१७ ते २०२१ या आर्थिक वर्षात किमान ६२२ कोटी रुपये, डीएमकेला ४३२ कोटी रुपये, एनसीपीला ५१ कोटी रुपये, 'आप'ला ४४ कोटी रुपये आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला सुमारे २४ कोटी रुपये मिळाले. बाँडद्वारे मिळाले.

CPI, CPM, BSP आणि मेघालयातील सत्ताधारी पक्ष NPP हे असे राजकीय पक्ष होते या पक्षांना २०१७ ते २०२१ या कालावधीत निवडणूक रोख्यांमधून कोणतीही निवडणूक देणगी मिळाली नाही.

२०२२-२३ या वर्षात किती निधी मिळाला?

मार्च २०२२-२३ दरम्यान एकूण २,८०० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकले. या संपूर्ण रकमेपैकी सुमारे ४६ टक्के रक्कम भारतीय जनता पक्षाच्या खात्यात आली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पक्षाने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १,२९४ कोटी रुपये मिळाले.

काँग्रेसला २०२२-२३ मध्ये पक्ष निधीमध्ये फक्त १७१ कोटी रुपये मिळाले. गेल्या आर्थिक वर्षात निवडणूक रोख्यांद्वारे २३६ कोटी रुपये मिळाले होते.२०२१-२२ मध्ये भाजपचे उत्पन्न  १,९१७ कोटी रुपये होते, ते २०२२-२३ मध्ये वाढून २,३६१ कोटी रुपये झाले. दुसरीकडे, काँग्रेसचे एकूण उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात ४५२ कोटी रुपये होते जे २०२१-२२ मध्ये ५४१ कोटी रुपये होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस