शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आणखी किती काळ आपण भांडणार? शहा-राऊत यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:34 AM

राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती. त्यासंबंधी शहा आणि संजय राऊत यांच्या खास भेटीची रंजक माहिती हाती आली आहे.जद (यु)चे हरिवंश यांना सत्ताधारी आघाडीने उमेदवार बनवल्यावर शंकेचे निरसन करण्यासाठी शहा थेट उध्दव ठाकरेंशी फोनवर बोलले. यावेळी संजय राऊत यांच्याशी बोला, असे त्यांनी शहांना सुचवले. मंगळवारी संसदेच्या आवारात शहा सकाळपासून राऊतांना शोधत होते. जेटलींच्या दालनात शहा तुमची वाट पहात आहेत असा निरोप एका दूतामार्फत राऊत यांना पाठवला. पण राऊत तिथे पोहोचेपर्यंत शहा राज्यसभा सभागृहात गेले होते. मग राऊतही तिथे गेले. राऊत यांना पहाताच शहांनी त्यांना आसनाजवळ बोलावले. शहा राऊतांना म्हणाले, ‘आणखी कितीकाळ आपण भांडणार आहोत? परवा हरिवंश यांची निवडणूक आहे. तुमची भूमिका नेमकी काय?’ त्यावर राऊत म्हणाले, ‘आपले भांडण आहे कुठे? काही मुद्यांवर मतभेद असलेच तर ते सोडवण्याचा फॉर्म्युला काय? ते तुम्हीच सांगा’. त्यावर शहा म्हणाले, ‘बाकीचे आपण नंतर पाहू, तूर्त उपसभापती पदाची महत्वाची निवडणूक आहे.’ राऊत त्यावर तत्परतेने म्हणाले ‘महाराष्ट्रातला मराठी उमेदवार जर मैदानात असेल तर शिवसेना त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिल याचे कारण आमची परंपरागत भूमिका तीच आहे’. यावेळी मागे बसलेल्या थावरचंद गहलोतांच्या समोरच्या माईकमुळे हे संभाषण अन्य सदस्यांनाही ऐकू येत होते. गहलोतांनी तसे दोघांना सांगितलेही. दरम्यान राऊतांचे उत्तर ऐकल्यावर शहा अस्वस्थ झालेले दिसले.>उपसभापती पदासाठी काँग्रेसचे बी. के. हरिप्रसादराज्यसभेच्या उपसभापती पदाची ९ आॅगस्टला होणारी निवडणूक सत्ताधारी आघाडीबरोबरच विरोधकांच्या एकजुटीचीही एकप्रकारे लिटमस टेस्टच आहे. रालोआतर्फे जद (यु)चे हरिवंश नारायण प्रसाद, तर विरोधकांतर्फे काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद अशी सरळ लढत आहे. गुप्त मतदान नसल्याने कोणता पक्ष कोणाच्या बाजूने आहे, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाह