शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनावर अलर्ट, केंद्रीय गृह सचिवांचं राज्यांना पत्र; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 09:15 IST

Coronavirus ; केंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र

ठळक मुद्देकेंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र सामान्यांना माहिती द्या, गृह सचिवांचं राज्यांना आवाहन

काही महिन्यांपूर्वी देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं कमी होत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांतं ३१ मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणं आणि कठोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या सख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आताही आपल्याला कठोर देखरेख आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. २७ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेले आदेश ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहेत,' असं गृह सचिवांच्यावतीनं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सामान्यांना माहिती द्याएसओपीअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींना यात परवानगी देण्यात आली आहे. तसंच एसओपी अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कठोरपणे केलं गेलं पाहिजे. परिवहन आणि सामान्य लोकांच्या आंतरराज्यीय ये-जा करण्यावर रोखण्यात येणार नसल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यांमधील संबंधित प्राधिकरणांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोरपणे पालन करायला लावावं. तसंच केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सामान्यांना माहिती दिली जावी, जेणेकरून ते लागू करण्यास समस्या निर्माण होणार नाही आणि ते थांबवण्यास मदतही मिळेल, असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत