शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिल्लीतल्या हिंसेत शहीद पोलिसाच्या पत्नीला अमित शाहांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 21:39 IST

अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देशाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते. केंद्रीय गृहमंत्री पत्रात लिहितात की, तुमचे पती एक आदर्श पोलीस होते. ज्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले होते. खर्‍या सैनिकाप्रमाणे त्यांनीही या देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. तुम्हाला दु:ख आणि अकाली नुकसान सहन करण्याची देवानं शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश तुमच्या कुटुंबासमवेत आहे. हिंसाचारादरम्यान दगडफेक झाल्यानं पोलीस कर्मचारी जखमी झाला. रतनलाल मूळचा राजस्थानच्या सीकरचा असून 1998मध्ये दिल्ली पोलिसात हवालदार पदावर दाखल झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तिन्ही मुले आता शिकत आहेत. रतनलालची आई संतरा देवी आणि भाऊ दिनेश गावी कुटुंबासमवेत राहतात. त्याचा एक भाऊ बंगळुरूमध्ये राहतो.नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हिंसाचारामुळे आतपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 150 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा