शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 8:17 AM

हवामान खात्याचा अहवाल; अकरा वर्षांतील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशामध्ये पडणारा मुसळधार पाऊस, वीज कोसळणे, वादळे, थंडीची लाट, वाढता उष्मा, धुळीची वादळे आदी घटनांमुळे २०१० ते २०२१ या अकरा वर्षांमध्ये दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भातील आकडेवारी हवामान खात्याने गोळा केली आहे. 

हवामानाशी निगडित विविध आपत्तींमुळे गेल्या ११ वर्षांत देशात ३२,०४३ लोकांचा मृत्यू झाला. त्याची सरासरी काढल्यास दर दिवशी आठ लोकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेही हवामान बदलाविषयी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, विसाव्या शतकात मध्य भारतातील तापमानात वाढ व पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी अवर्षणाची स्थिती निर्माण झाली. समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, १९०१ ते २०१८ या कालावधीत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. १९८६ ते २०१५ या ३१ वर्षांच्या कालावधीत सर्वात उष्ण दिवस व सर्वात कडाक्याच्या थंडीची रात्र यांच्या तापमानात अनुक्रमे ०.६३ अंश सेेल्सिअस व ०.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

गंगा, सिंधू खोऱ्यात उष्मा

तापमान व आर्द्रता यांच्यात झालेल्या वाढीमुळे गंगा व सिंधू नदीच्या खोऱ्यात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. १९५१ ते २०१५ या कालावधीत हिंद महासागराच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

- १३,३०३ जणांचा २०१० ते २०२१ या कालावधीत मध्य भारतात मुसळधार पावसामुळे झाला. 

- ६.४९५ उष्माघाताने मृत्यू, २,४८९ थंडीने मृत्यू, ३,८३२ वादळामुळे मृत्यू, ८९५ जणांचा मृत्यू चक्रीवादळामुळे, ४४६ धुळीच्या वादळांमुळे जणांना जीव गमवावा लागला. ३४५ तुफान हिमवृष्टीमुळे  जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :RainपाऊसHeat Strokeउष्माघात