शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

हृदयद्रावक! गरम - गरम जेवणाच्या मोठ्या पातेल्यात पडल्याने ३ वर्षीय चिमुकलीचा होरपळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:21 IST

3 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देजेवण बनविणाऱ्या महिलेने कानात इयरफोन घातले होतेयाप्रकरणी जेवण बनविणाऱ्या महिलेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. बांधकाम साहित्यामुले अडखळून तीन वर्षाची मुलगी भाजीच्या पातेल्यात पडली

मिर्जापूर - रामपूर अटारी गावात एका शाळेत दुपारच्या गरम - गरम जेवणाच्या भांड्यात पडल्याने 3 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनविणाऱ्या महिलेने कानात इयरफोन घातले होते, त्यामुळे मुलीच्या रडण्याचा आवाज आला नाही. त्यांना काहीच कळले नाही आणि जेव्हा कळाले तेव्हा त्या घाबरून पळून गेल्या.

उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रामपूर अटारी गावात शाळेच्या दुपारच्या जेवणाच्या गरम भाजीच्या पातेल्यात ३ वर्षीय मुलगी पडली. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेवण बनविणाऱ्या महिलेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. महिला कानात इयरफोन घालून गाणी ऐकत होती. जिल्हाधिकारी यांनी मुख्याध्यापकास निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम साहित्यामुले अडखळून तीन वर्षाची मुलगी भाजीच्या पातेल्यात पडली, असे आघाडीच्या दैनिकात नमूद करण्यात आले आहे. मृत मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, स्वयंपाक करणाऱ्या महिलेने पातेल्यात पाहिले नाही कारण तिच्या कानात इयरफोन चालू होते.काय घडले हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा ती “घाबरून” गेली, असे एएनआयने म्हटले आहे.पीडित मुलगी शालेय विद्यार्थी नव्हती, अशी माहिती मिरजापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सोमवारी दिली. पण नाव न घेण्यास घेण्याच्या अटीवर एका अधिका्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, ती आस्थापनेशी संलग्न असलेल्या अंगणवाडीत शिकत होती. पूर्व उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरापासून काही तासाच्या अंतरावर रामपूर अटारी गावात ही शाळा आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी सुशील कुमार पटेल यांनी सोमवारी सांगितले की, मुख्याध्यापकांना त्वरित निलंबित केले जाईल. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याला एफआयआर दाखल करण्यास सांगितले, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे नोव्हेंबरमध्ये बालवाडीच्या एका विद्यार्थ्याचा नोव्हेंबरमध्ये मृत्यू झाला होता. गरम सांभारच्या पातेल्यात पळताना पडून मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळाsuspensionनिलंबन