शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयद्रावक! गरम - गरम जेवणाच्या मोठ्या पातेल्यात पडल्याने ३ वर्षीय चिमुकलीचा होरपळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:21 IST

3 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देजेवण बनविणाऱ्या महिलेने कानात इयरफोन घातले होतेयाप्रकरणी जेवण बनविणाऱ्या महिलेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. बांधकाम साहित्यामुले अडखळून तीन वर्षाची मुलगी भाजीच्या पातेल्यात पडली

मिर्जापूर - रामपूर अटारी गावात एका शाळेत दुपारच्या गरम - गरम जेवणाच्या भांड्यात पडल्याने 3 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनविणाऱ्या महिलेने कानात इयरफोन घातले होते, त्यामुळे मुलीच्या रडण्याचा आवाज आला नाही. त्यांना काहीच कळले नाही आणि जेव्हा कळाले तेव्हा त्या घाबरून पळून गेल्या.

उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रामपूर अटारी गावात शाळेच्या दुपारच्या जेवणाच्या गरम भाजीच्या पातेल्यात ३ वर्षीय मुलगी पडली. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेवण बनविणाऱ्या महिलेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. महिला कानात इयरफोन घालून गाणी ऐकत होती. जिल्हाधिकारी यांनी मुख्याध्यापकास निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम साहित्यामुले अडखळून तीन वर्षाची मुलगी भाजीच्या पातेल्यात पडली, असे आघाडीच्या दैनिकात नमूद करण्यात आले आहे. मृत मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, स्वयंपाक करणाऱ्या महिलेने पातेल्यात पाहिले नाही कारण तिच्या कानात इयरफोन चालू होते.काय घडले हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा ती “घाबरून” गेली, असे एएनआयने म्हटले आहे.पीडित मुलगी शालेय विद्यार्थी नव्हती, अशी माहिती मिरजापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सोमवारी दिली. पण नाव न घेण्यास घेण्याच्या अटीवर एका अधिका्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, ती आस्थापनेशी संलग्न असलेल्या अंगणवाडीत शिकत होती. पूर्व उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरापासून काही तासाच्या अंतरावर रामपूर अटारी गावात ही शाळा आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी सुशील कुमार पटेल यांनी सोमवारी सांगितले की, मुख्याध्यापकांना त्वरित निलंबित केले जाईल. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याला एफआयआर दाखल करण्यास सांगितले, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे नोव्हेंबरमध्ये बालवाडीच्या एका विद्यार्थ्याचा नोव्हेंबरमध्ये मृत्यू झाला होता. गरम सांभारच्या पातेल्यात पळताना पडून मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळाsuspensionनिलंबन