शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ह्रदयद्रावक... केबीसीत लाखो जिंकणाऱ्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 20:11 IST

राजस्थानमधील सिकर येथील तीन जणांचा मृत्यू झाला असून 34 वर्षीय डॉ. दीपा शर्मां यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. दीपा शर्मा ह्या लेखिका होत्या, त्यांनी पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं.

ठळक मुद्देराजस्थानमधील सिकर येथील तीन जणांचा मृत्यू झाला असून 34 वर्षीय डॉ. दीपा शर्मां यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. दीपा शर्मा ह्या लेखिका होत्या, त्यांनी पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं.

जयपूर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. यात गाडीवर मोठ-मोठे दगड पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, एका नेव्ही अधिकाऱ्याचा समावेश असून राजस्थानच्या सिकर येथील तिघांनी आपला जीव गमावला आहे. त्यामध्ये, 2013 साली कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या डॉ. दीपा शर्माचेही निधन झाले आहे. 

राजस्थानमधील सिकर येथील तीन जणांचा मृत्यू झाला असून 34 वर्षीय डॉ. दीपा शर्मां यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. दीपा शर्मा ह्या लेखिका होत्या, त्यांनी पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. दीपा यांनी विज्ञान शाखेतून क्लिनीकल न्यूट्रीशनिस्ट आणि डाएटेटीक्स विषयात आपली पदवी पूर्ण केली होती. सोशल मीडियावरही त्या खूप अक्टीव्ह होत्या, म्हणूनच ट्विटरवर त्यांचे 20 हजार फॉलोअर्स आहेत. 

दीपा यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 7 व्या सिझनमध्ये 2013 साली सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये, 6.40 लाख रुपयेही जिंकले होते. दीपा यांचा मोठा भाऊ महाराष्ट्रातील विद्युत वितरण विभागात इंजिनिअर आहे. तर, लहान बहिण संध्या बंगळुरू येथे वास्तव्यास आहे. दीपा यांच्या हिमाचल प्रदेशातील पिकनीक टूरपूर्वीच त्यांची आई लहान बहिणीकडे बंगळुरूला राहण्यास गेली होती. दीपाचे वडिल रामभरोसे शर्मा हे मूळचे करौली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. दीपा राहत असलेल्या शांतीनगर येथील शेजाऱ्यांनी दीपाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दीपा ही अतिशय चांगली मुलगी होती, कोरोना काळात अनेकांना तिने मदत केल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.   नेव्ही लेफ्टनंटचाही मृत्यू

भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूलही तुटला आहे. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आहे. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यामध्ये, 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 राजस्थानचे, दोन छत्तीसगढचे एक दिल्ली आणि एक महाराष्ट्राचा रहिवाशी आहे. तर, एकाची अद्याप ओळख पटली नाही. मृतांमध्ये नेव्हीतील लेफ्टनंट अमोघ बापट यांचा मृत्यू झाला आहे. अमोघचे कुटुंब छत्तीसगडमध्ये वास्तव्याला असून त्याचं पोस्टिंग अंदमान-निकोबार बेटांवर होतं. 

टॅग्स :Accidentअपघातlandslidesभूस्खलनKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशRajasthanराजस्थान