हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 16:07 IST2024-07-04T16:04:48+5:302024-07-04T16:07:17+5:30
हाथरस येथील घटनेनंतर आता धक्कादायक खुलासे होत आहेत. सूरजपाल सिंह जाटव यांनी २४ मे २०२३ रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टला दिली.

हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या
हाथरसमधील सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. बाबा भक्तांकडून पैसे घेत नव्हते तरीही त्यांची प्रत्येक शहरात मोठी मालमत्ता आहे. या बाबांची भक्तांमध्ये वेगवेगळी नाव आहेत. नारायण साकार हरी, विश्व हरी, भोले बाबा पण त्यांचे खरे नाव सूरजपाल सिंह जाटव आहे. वय सुमारे ५८ असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी हाथरसला जाणार, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार!
सूरजपाल सिंह जाटव हे त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचा पेहराव पाहून ते बाबा आहेत असे कोणीही म्हणू शकत नाही आणि अनेक राज्यात त्यांचे हजारो भक्त आहेत. आता हळूहळू बाबांचे रहस्य उघड होत आहे. हातरस दुर्घटनेनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, मात्र एफआयआरमध्ये बाबांचे नाव नाही. एफआयआरमध्ये नाव नसतानाही बाबा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सध्या उत्तर प्रदेश व्यतिरिक्त उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली आणि देशाच्या इतर भागातही बाबांचे भक्त आहेत. जे आशीर्वाद घेण्यासाठी सत्संगाला येत होते. सूरजपाल सिंह जाटव हे एटा जिल्ह्यापासून वेगळे झालेल्या कासगंजमधील पटियाली येथील बहादूरनगर गावचे रहिवासी आहेत. तसे, आता बाबा कधीतर गावी जातात. मात्र बहादूरनगर हे बाबांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असून येथे दररोज लोकांची मोठी गर्दी होत असते. बाबांचे इथे मोठे साम्राज्य आहे.
बहादूरनगरमध्ये बाबा चॅरिटेबल ट्रस्ट असून, येथे शेकडो लोक काम करतात. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, बाबांच्या नावावर २०-२५ एकर जमीन आहे, तिथे शेती केली जाते. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची ट्रस्टचे लोक काळजी घेतात. बहादूरनगर ट्रस्टमध्ये महिला सेविकांची संख्याही मोठी आहे. बाबांचे आश्रम उत्तर प्रदेशातील नोएडा येथे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय बाबांचे अनेक राज्यात ठिकाणही आहेत.
भोले बाबा त्यांच्या भक्तांकडून कोणतेही दान, दक्षिणा किंवा प्रसाद घेत नाहीत. पण असे असूनही त्यांचे अनेक आश्रम स्थापन झाले आहेत. उत्तर प्रदेशात इतरही अनेक ठिकाणी मालकीच्या जमिनीवर आश्रम स्थापन करण्याचे दावे केले जात आहेत. विशेषत: पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये बाबांचे अनेक एकर जागेवर आश्रम आहेत, जेथे सतत सत्संगाचे कार्यक्रम होतात. बाबांच्या अनुयायांपैकी सर्वात मोठा वर्ग अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील आहे.