शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Hathras Case : यूपी सरकार पीडितांऐवजी गुन्हेगारांना वाचवतंय, राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 16:51 IST

Rahul Gandhi : महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने डिजिटल मोहीम राबविली.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने डिजिटल मोहीम राबविली. त्याअंतर्गत राहुल गांधी यांनी आपला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

"काही दिवसांपूर्वी मी हाथरसला गेलो होतो, जाताना मला अडविण्यात आले. दुसऱ्यांदा मी गेलो. त्यावेळी मला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून का रोखले गेले. त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर खून झाला. ज्यावेळी मी पीडित कुटुंबाशी बोललो, त्यावेळी सरकारने पीडितांवर हल्ले करण्यास सुरूवात केली," असे राहुल गांधींनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सरकारचे काम गुन्हेगारांचे रक्षण करणे नाही, यूपी सरकार पीडितांना न्याय देत नाही. यूपी सरकारने गुन्हेगारांना तुरूंगात टाकले पाहिजे. देशातील कोट्यवधी महिलांसोबत असे घडते, असे सांगत राहुल गांधी यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला. तसेच, आपल्याला समाज बदलला पाहिजे आणि माता-भगिनींसोबत जे काही केले जात आहे, तो अन्याय आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

याचबरोबर, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, "हाथरस घटनेत सरकारचे वागणे अमानवीय आणि अनैतिक आहे. पीडितेच्या कुटूंबाला मदत करण्याऐवजी ते गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. चला, देशभरातील महिलांवर होणाऱ्या अन्यायविरूद्ध आवाज उठवूया - एक पाऊल बदलाच्या दिशेने."

राहुल गांधींच्या अगोदर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करून यूपी सरकारला लक्ष्य केले होते. दरम्यान,  गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी सुरुवातीला पीडित कुटुंबाची भेट घेण्यास राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसर्‍या राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्यास परवानगी दिली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारcongressकाँग्रेस