शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

बापरे! वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून फक्त 4 दिवसांत 1.41 कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 10:35 AM

नवीन तरतुदीनंतर आता तब्बल 1 कोटी 41 लाख 22 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देनवीन तरतुदीनंतर आता तब्बल 1 कोटी 41 लाख 22 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. ओडिशात नियम लागू झाल्यापासून 4,080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.हरियाणामध्ये 343 जणांकडून तब्बल 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे

नवी दिल्ली - भारतात 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास 30 पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कार, बाईक चालविताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो. या नवीन तरतुदीनंतर आता तब्बल 1 कोटी 41 लाख 22 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. 

हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यांत मिळून केवळ चार दिवसांत 1.41 कोटी रुपये  दंडवसुली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा मोटार वाहन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून 4,080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 46 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

हरियाणामध्ये देखील अशाच प्रकारे दंड वसूल करण्यात आला आहे. 343 जणांकडून तब्बल 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये नवा वाहन कायदा लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी 3900 जणांवर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. भारतात वाहतुकीचे नियम तोडल्यास असणारा दंड अधिक असल्याचं येथील लोकांना वाटतं. मात्र इतर देशात वाहतुकीचे नियम तोडल्यास असणारी रक्कम ही जास्त आहे. भारताप्रमाणे इतरही देशात वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी दंडाची रक्कम ठरवण्यात आलेली असते. विविध देशात ही रक्कम वेगवेगळी आहे. हाँगकाँग, अमेरिका, जर्मनी, जपान, सिंगापूरमध्ये नियम तोडल्यास असणारी दंडांची रक्कम ही लाखांमध्ये आहे. 

भारतात जर तुम्ही विना परवाना गाडी चालवत असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याचसोबत दारुच्या नशेत गाडी चालविली तर 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हे नियम मोडल्यामुळे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. जर अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केल्यास, त्याच्या पालकांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. 

भारतात वाहतुकीचे नियम मोडल्यास 15 हजारापर्यंत दंड तर 2 वर्षाची शिक्षा   

सामान्य दंडाची रक्कम - पूर्वी 100 रुपयांवरून आता 500 रुपये 

हेल्मेट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना निलंबित 

विना परवाना गाडी चालविणे - पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केला तर पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा 

सीट बेल्ट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - पूर्वी 1 हजार रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

भरधाव वेगाने वाहन चालविल्यास - पूर्वी 400 रुपये दंड होता तर आता पहिल्यांदा पकडल्यास हलक्या वाहनांवर 1 ते 2 हजार रुपये दंड तर जड वाहनांना 2 ते 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास परवाना जप्त करण्यात येणार आहे. 

रॅश ड्रायव्हिंग - पहिल्यांदा 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत जेल आणि 1 हजार ते 5 हजार दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्षापर्यंत जेल आणि 10 हजार रुपये दंड

 दारू पिऊन गाडी चालविल्यास - पहिल्यांदा 6 महिने जेल आणि 10 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्ष जेल आणि 15 हजार रुपये दंड  

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीOdishaओदिशाdelhiदिल्लीIndiaभारत