शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

घर आहे की छळछावणी? कुटुंबातच होतोय महिलांचा छळ; उत्तर प्रदेश सर्वाधिक असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:02 IST

अत्याचार पुन्हा वाढले : वर्षभरात ६,९०० प्रकरणे

नवी दिल्ली : महिला घरातच सुरक्षित असल्याचे मानले जात होते; पण ताजी आकडेवारी काहीतरी वेगळेच सांगते. महिलांचा छळ होण्याचे सर्वाधिक ठिकाण हे घरच असल्याचे आणि कुटुंबातच मोठा छळ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.  देशात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी मोठी वाढ झाली असून, २०२२ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने ६,९०० प्रकरणे नोंदविली आहेत.

वाढत्या गुन्ह्यांमुळे महिला आयोगाची चिंता वाढली आहे. २०२० मध्ये महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या एकूण तक्रारींची संख्या सुमारे २३,७०० होती. मात्र केवळ एकाच वर्षात म्हणजे २०२१ मध्ये त्यात ३० टक्क्यांनी वाढ होत ही संख्या ३०,८०० पेक्षा जास्त झाली. २०२२ मध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये किंचित वाढ झाली. 

तक्रारी का वाढल्या? 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, तक्रारींची संख्या २०१४ नंतर आता सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींच्या संख्येत वाढ होण्याचे कारण म्हणजे जनसुनावणी आणि २४ तास चालणाऱ्या हेल्पलाइनमुळे महिलांना मदत मिळत आहे.

रोखण्यासाठी काय गरजेचे? 

  • अत्याचाराबाबत पुढे येऊन बोला
  • महिला आयोगाकडे ॲानलाइन तक्रार करा
  • कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती
  • रूढीवादी विचारांना विरोध
  • पितृसत्ताक मानसिकता बदलण्याची गरज
टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिस