शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Happy Republic Day 2020 ! प्रजासत्ताक दिनाबाबतच्या १० इंटरेस्टींग गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 9:49 AM

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे.

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाचंभारतासाठी फार मोठं महत्त्व आहे. कारण याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत लोकांचं राज्य झाला होता. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. चला जाणून घेऊ आणखीही काही खास गोष्टी...

१) जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.  

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला.

३) १९५० मध्ये याच दिवशी १० वाजून १८ मिनिटांनी भारतीय संविधान लागू करण्यात आले होते. आणि त्यानंतर सहा मिनिटांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. 

४) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वजाचं ध्वजोरोहण करतात. तर पंतप्रधान अमर जवान ज्योतीवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव गमावलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात. 

५) १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या परेडसाठी कोणतीही निश्चित जागा नव्हती. कधी इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला तर कधी रामलीला मैदानावर प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात होता. नंतर १९५५ मध्ये राजपथ परेडसाठी निश्चित करण्यात आले. 

६) परेडदरम्यान राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाते. ही सलामी भारतीय सेनेच्या ७ तोफांनी दिली जाते. या तोफा १९४१ मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. राष्ट्रगीत सुरु होताच पहिली सलामी आणि नंतर ५२ सेकंदानंतर शेवटची सलामी दिली जाते. 

७) दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एखाद्या देशाच्या मुख्य व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं जातं. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे आले होते. 

८) दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या शेवटी Abide With Me हे ख्रिश्चन गाणं वाजवलं जातं. असे म्हणतात की, हे गाणं महात्मा गांधी यांना फार पसंत होतं. 

९) प्रजासत्ताक दिनाच्या समारोह फार वक्तशीरपणे साजरा केला जातो. प्रत्येक सेकंदाचा हिशेब ठेवला जातो. म्हणजे कार्यक्रम जर एक मिनिट उशीराने सुरू झाला असेल तर १ मिनिट उशीरानेच संपतो. 

१०) भारतीय संविधान हे पूर्णपणे हाताने लिहिले गेले होते. जे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. हाताने लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या कॉपी संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.  

 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndiaभारतdelhiदिल्ली