शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Gujarat Election: भाजपानं जुना फॉर्म्युला बदलला; प्रत्येक घरातून ३ मते घेण्याची रणनीती आखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:57 IST

या निवडणुकांमध्येही पक्ष तिकीट वाटपासाठी नो रिपीट फॉर्म्युला लागू करू शकतो

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपा-काँग्रेससोबतच यावेळी आम आदमी पक्षही निवडणुकीच्या रणांगणात उतरलं आहे. मात्र, २७ वर्षांनंतर सत्ताधारी भाजपाने आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी जुना फॉर्म्युला बदलला आहे. या निवडणुकीत पक्ष नवा फॉर्म्युला घेऊन रिंगणात उतरला आहे. याला पन्ना कमिटी असं नाव देण्यात आले आहे. मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एका समितीमध्ये पाच सदस्य निवडले आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील तीन सदस्यांची मते भाजपाला मिळवून देण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असेल. पक्षाने संपूर्ण राज्यात ८२ लाख पन्ना सदस्य केले आहेत. यामध्ये प्रत्येक पेज सदस्याला तीन मते मिळावीत, असं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

गुजरात निवडणुकीचे काम पाहणारे पक्षाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ खासदार यांनी सांगितले की, "जुलै २०२० मध्ये ८ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत पक्षाने पहिल्यांदा हे मॉडेल स्वीकारलं." या पोटनिवडणुकीत पक्षाने सर्व जागा जिंकल्या. त्यानंतर २०२१ च्या गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत हे मॉडेल पुन्हा लागू करण्यात आले. यामध्ये भाजपला ८० टक्क्यांहून अधिक जागांवर यश मिळाले. या नव्या सूत्रानुसार भाजपाने सर्व पन्ना सदस्यांना ओळखपत्र जारी केले आहे. यामध्ये ते भाजपचे अधिकृत कार्यकर्ता म्हणून ओळखले जातील. मतदानापूर्वी मंडळ किंवा जिल्हा स्तरावरील नेते त्यांच्या भागातील सर्व पन्ना सदस्यांच्या घरी एकदा तरी भेट देतील.

भाजपाचा नो रिपीट फॉर्म्यूला लागू होणार?या निवडणुकांमध्येही पक्ष तिकीट वाटपासाठी नो रिपीट फॉर्म्युला लागू करू शकतो. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्ष २५ टक्के नव्या चेहऱ्यांना तिकिटे देईल, मात्र तिकिटासाठी उमेदवाराची विजयी क्षमता हाच एकमेव निकष आहे. इतर उमेदवारांपेक्षा जास्त जिंकण्याची क्षमता असेल तर पक्ष तीन ते चार वेळा निवडून येणाऱ्या उमेदवारांना तिकीट देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाने गुजरातमध्ये २५ टक्के नव्या चेहऱ्यांना तिकीट दिल्यास विद्यमान आमदारांची मोठ्या प्रमाणात तिकिटे कापावी लागतील. अशा स्थितीत निवडणुकीतील महत्त्वाची जबाबदारी माजी आमदार आणि उमेदवारांवर सोपविण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे.

गुजरातवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी भाजपानं पुन्हा चारही विभागात मोर्चेबांधणी केली आहे. जातीय आणि भौगोलिक समीकरण लक्षात घेऊन राज्यातील १८२ जागांची चार भागांमध्ये (सौराष्ट्र, उत्तर, पश्चिम, मध्य प्रदेश) विभागणी करण्यात आली आहे. सौराष्ट्रातील उत्तर प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, उत्तरेकडील राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांना ड्युटी लावण्यात आली आहे. या चार भागात मंत्री, आमदार, माजी आमदार आणि केंद्रीय नेते प्रचाराला उतरवण्यात येणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरात