शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

नवरदेवाच्या FB पोस्टनं सगळेच हादरले; कोणी माझी मदत करेल का? करतोय विनवणी, १८ जूनला लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 8:46 AM

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते

ठळक मुद्दे२२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोयघोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे.भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील बुंदेलखेडच्या महोबा जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. याच छळाला कंटाळून एका नवऱ्याने ज्याचं लग्न १८ जून रोजी होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांकडे मदतीची याचना केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, १८ जूनला माझं लग्न आहे आणि घोड्यावर बसून मला वरात काढायची इच्छा आहे. कोणी माझी मदत करू शकेल का? असं त्याने विचारलं आहे.

नवरदेवाच्या या सोशल मीडिया पोस्टनं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. स्वातंत्र्य भारतात आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी का नाही? असा संतप्त प्रश्न लोकं विचारू लागली आहे. ही सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. २२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोय. अलखरामचं लग्न १८ जून रोजी होणार आहे.

अलखराम ज्या गावात राहतो त्याठिकाणी दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. गावातील दबंग आणि उच्चवर्णीय लोक दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे घोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे. अलखरामच्या वडिलांनी महोबकंठच्या पोलीस ठाण्यात पत्र लिहून विनंतीही केली आहे.

महोबा जिल्ह्यातील महोबकंठ येथे माधवगंज नावाचं २ हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही दलित समाजातील नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. आतापर्यंत कोणत्याही दलित कुटुंबाने याचा विरोध केला नाही कारण गावातील काही दबंग लोकांची दहशत या लोकांच्या मनात कायम आहे. गावातील संकुचित विचारधारेचे लोक आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. या गावातील वृद्ध लोक सांगतात कोणत्याही दलिताला घोड्यावर बसून वरात काढता येत नाही.

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या परिसरातील गावात स्वातंत्र्यानंतरही कोणत्याही दलित नवरदेवाला घोड्यावर वरात काढणं दूरच पण कार, बाईकवरूनही नवरदेव गावातून निघू शकत नाही. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते. आता अलखरामच्या सोशल मीडिया पोस्टनं जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परंतु काहीच करता येत नाही. मात्र भीम आर्मीनं यात उडी घेतली आहे. अलखरामची वरात घोड्यावरून काढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश