शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जीवघेणी नोकरी! पहाटे ५ पासून रांगेत, ११ वाजता चाचणीला सुरुवात; धावता धावता जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 10:38 IST

पोलीस शिपाई भरतीसाठी विविध जिल्ह्यात मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यातील घडलेल्या प्रकारामुळे झारखंड सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडलं आहे.  

जमुई - झारखंड राज्यात पोलीस शिपाई भरती सुरू आहे. शारिरीक चाचणीसाठी विविध जिल्ह्यात धावस्पर्धा घेण्यात येत आहे. मात्र या मैदानी चाचणीत ११ उमेदवारांच्या मृ्त्यूनं खळबळ माजली आहे. यात बिहारच्या एका युवकाचा जीव गेला आहे. मोठ्या भावाच्या जाण्यानं छोट्या भावाला धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेनं युवकाच्या कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या गंगरा गावातील २ भाऊ २७ ऑगस्टला झारखंड गिरिडीह येथे शिपाई भरतीत उतरले होते. यावेळी २८ ऑगस्टला धावण्याची स्पर्धा होती. पहाटे ५ वाजता त्याला सुरुवात होणार होती. सर्व उमेदवार ५ वाजल्यापासून रांगेत उभे होते परंतु ११ वाजता धावण्याची स्पर्धा सुरू झाली. भीषण उष्णतेमुळे गोविंद कुमारसह अनेक उमेदवार धावताना बेशुद्ध पडले. 

छोट्या भावाने स्पर्धा अर्धवट सोडली...

उष्णतेमुळे छोट्या भावाने २ राऊंडनंतर मैदान सोडले मात्र मोठा भाऊ गोविंद कुमार नोकरी मिळवण्याच्या जिद्दीनं धावत राहिला. स्पर्धा अर्धवट सोडून छोटा भाऊ मोठ्या भावाची वाट पाहत होता. तेव्हा सूचना मिळाली की जवळपास १२ उमेदवार चक्कर येऊन कोसळले आहेत. गोविंद कुमारची स्थिती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर गिरिडिहच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. मात्र त्याठिकाणाहून रात्री त्याला धनबादला नेण्यात आले. 

धनबादमध्येही गोविंद कुमारची प्रकृती सुधारत नसल्याने त्याला रांचीला हलवलं परंतु त्याठिकाणी २ तास वाट बघितल्यानंतरही तिथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले नाही त्यातच गोविंदचा मृत्यू झाला. गोविंदच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. घरातील एकमेव कमवता मुलगा गेल्याने कुटुंब कोलमडलं आहे. गोविंद गंगरा पंचायतीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. 

सरकारकडे मदतीची मागणी

गोविंदच्या मृत्यूनं त्याच्या वडिलांचा आधार गेला आहे. गोविंदचे वडील आणि छोटा भाऊ निर्मित यांनी गोविंदच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे गोविंदचा जीव गेल्याने त्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी कुटुंबाने सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस