शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी नोकरी! पहाटे ५ पासून रांगेत, ११ वाजता चाचणीला सुरुवात; धावता धावता जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 10:38 IST

पोलीस शिपाई भरतीसाठी विविध जिल्ह्यात मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यातील घडलेल्या प्रकारामुळे झारखंड सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडलं आहे.  

जमुई - झारखंड राज्यात पोलीस शिपाई भरती सुरू आहे. शारिरीक चाचणीसाठी विविध जिल्ह्यात धावस्पर्धा घेण्यात येत आहे. मात्र या मैदानी चाचणीत ११ उमेदवारांच्या मृ्त्यूनं खळबळ माजली आहे. यात बिहारच्या एका युवकाचा जीव गेला आहे. मोठ्या भावाच्या जाण्यानं छोट्या भावाला धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेनं युवकाच्या कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या गंगरा गावातील २ भाऊ २७ ऑगस्टला झारखंड गिरिडीह येथे शिपाई भरतीत उतरले होते. यावेळी २८ ऑगस्टला धावण्याची स्पर्धा होती. पहाटे ५ वाजता त्याला सुरुवात होणार होती. सर्व उमेदवार ५ वाजल्यापासून रांगेत उभे होते परंतु ११ वाजता धावण्याची स्पर्धा सुरू झाली. भीषण उष्णतेमुळे गोविंद कुमारसह अनेक उमेदवार धावताना बेशुद्ध पडले. 

छोट्या भावाने स्पर्धा अर्धवट सोडली...

उष्णतेमुळे छोट्या भावाने २ राऊंडनंतर मैदान सोडले मात्र मोठा भाऊ गोविंद कुमार नोकरी मिळवण्याच्या जिद्दीनं धावत राहिला. स्पर्धा अर्धवट सोडून छोटा भाऊ मोठ्या भावाची वाट पाहत होता. तेव्हा सूचना मिळाली की जवळपास १२ उमेदवार चक्कर येऊन कोसळले आहेत. गोविंद कुमारची स्थिती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर गिरिडिहच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. मात्र त्याठिकाणाहून रात्री त्याला धनबादला नेण्यात आले. 

धनबादमध्येही गोविंद कुमारची प्रकृती सुधारत नसल्याने त्याला रांचीला हलवलं परंतु त्याठिकाणी २ तास वाट बघितल्यानंतरही तिथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले नाही त्यातच गोविंदचा मृत्यू झाला. गोविंदच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. घरातील एकमेव कमवता मुलगा गेल्याने कुटुंब कोलमडलं आहे. गोविंद गंगरा पंचायतीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. 

सरकारकडे मदतीची मागणी

गोविंदच्या मृत्यूनं त्याच्या वडिलांचा आधार गेला आहे. गोविंदचे वडील आणि छोटा भाऊ निर्मित यांनी गोविंदच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे गोविंदचा जीव गेल्याने त्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी कुटुंबाने सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस