शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम फत्ते केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 10:17 AM

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ठळक मुद्देशेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चंढीगड - राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे, केंद्र सरकारने आक्रमक पाऊलं उचलत पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, पंजाब आणि हरयाणामध्येइंटरनेट बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मंदिरावर कर्णा म्हणजे स्पीकर लाऊन गावागातील शेतकऱ्यांपर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचं काम केलंय.  

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे, सरकारने इंटरनेट बंद केले असले तरी, आपल्या कल्पतेतून हरयाणातील शेतकऱ्यांनी गुरुद्वारा आणि मंदिरावर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरवरुन आपला संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. गावागावातील मंदिराबाहेर लाऊडस्पीकर ऐकण्यासाठी शेतकरी जमा होत आहेत. जिंद जिल्ह्यातील 17 खाप पंचायतीच्या प्रमुखांनी मंदिराच्या लाऊडस्पीकवरुन लोकांपर्यंत संदेश पोहविण्याच्या कामाला गती दिली आहे. तसेच, आंदोलनासंदर्भात सूचना आणि रणनितीही आखण्यात या लाऊडस्पीकरचा मोठा उपयोग होत आहे. त्यामुळेच, शेतकऱ्यांसारखा जुगाड कुणीही करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील 17 जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे. केवळ मोबाईल रिचार्ज आणि बँकींग व्यवहार सोडून सर्व एसएमएस सर्व्हीस 31 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आता, यामध्ये वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.  

2 फेब्रुवारीला होणार चर्चेची दुसरी फेरी

शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व सरकारदरम्यान चर्चेची पुढची फेरी २ फेब्रुवारी होणार असल्याचे वृत्त आहे. तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.  शनिवारी पंतप्रधानांनी म्हटले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहेत. २२ जानेवारीला सरकार आणि संघटनांमध्ये चर्चेची १२ वी फेरी झाली. पण, सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याच्या प्रस्तावाशिवाय अन्य पाऊल उचलण्याची तयारी दाखविली नाही. हा प्रस्ताव फेटाळून कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने कोंडी ‘जैसे थे’आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपInternetइंटरनेट