शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

सरकारवरील कर्ज साडेचार वर्षांत ८२ लाख कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:17 AM

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत सरकारवरील कर्ज ४९ टक्के वाढून ८२ लाख कोटी रुपये झाले आहे.

नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत सरकारवरील कर्ज ४९ टक्के वाढून ८२ लाख कोटी रुपये झाले आहे. सरकारवरील कर्जाची अवस्था सांगणाऱ्या दस्तावेजाचा आठवा अहवाल शुक्रवारी प्रसिद्धीस दिला गेला, त्यात ही माहिती आहे.सप्टेंबर २०१८ अखेरची माहिती त्यात उपलब्ध असून, त्याच्याशी तुलना केल्यास ही रक्कम ८२,०३,२५३ कोटी रुपये आहे. हीच रक्कम जून २०१४ अखेर ५४,९०,७६३ कोटी रुपये होती, असे सरकारने घेतलेल्या कर्जाची माहिती देताना अर्थमंत्रालयाने सांगितले. सरकारवरील सार्वजनिक कर्ज गेल्या साडेचार वर्षांत ४८ लाख कोटी रुपयांवरून ७३ लाख कोटी रुपये (५१.७ टक्के वाढ) झाले व त्याचा परिणाम अंतर्गत कर्जात ५४ टक्के वाढ होऊन ते ६८ लाख कोटी रुपये होण्यात झाला. बाजारातून घेतल्या जाणाºया कर्जातही याच साडेचार वर्षांत ४७.५ टक्के वाढ होऊन ते ५२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज जून २०१४ मध्ये शून्य होते. ते सुवर्ण मुद्रीकरण योजनेसह (गोल्ड मोनिटायझेशन स्कीम) ९,०८९ कोटी झाले. या दस्तावेजात केंद्र सरकारने भारत सरकारच्या एकूण कर्ज परिस्थितीचे तपशीलवार विश्लेषण केले आहे. २०१०-२०११ पासून अर्थमंत्रालय सरकारी कर्जाच्या अवस्थेची माहिती दरवर्षी देत असते. सरकारच्या आर्थिक व्यवहारातील आर्थिक तुटीचा तपशीलही त्यात आहे.>तूट भरून काढायला कर्जाचा आधारसरकार प्रामुख्याने त्याच्या आर्थिक तुटीला भरून काढण्यासाठी बाजाराशी जोडलेल्या कर्जाचा आधार घेते. देशाचे कर्ज वाढत असताना चालू आर्थिक वर्षात आर्थिक तुटीच्या बाजूने फारच थोड्या मदतीची अपेक्षा आहे. आर्थिक तूट पहिल्या आठ महिन्यांत नोव्हेंबरपर्यंत ७.१७ लाख कोटी किंवा पूर्ण वर्षाच्या लक्ष्याच्या ६.२४ लाख कोटी रुपयांच्या ११४.८ टक्के होती.