शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत वाढ; देशभरात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 1:37 AM

२०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद

मुंबई : जागतिक तापमानवाढीचा धोका दिवसागणिक वाढतच असून, वेगाने बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तीही ओढविण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वर्षांच्या नोंदीही वाढतच असून, २०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली असतानाच या वर्षात घडलेल्या आपत्कालीन घटनांत महाराष्ट्रात २३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे आपत्कालीन दुर्घटनांमुळे राष्ट्रीय स्तरावरील मनुष्यहानीचा विचार करता अशा दुर्घटनांत १ हजार ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत सरकारचे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय व भारतीय हवामान शास्त्र विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, २ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात आलेल्या महापुरासह मुसळधार पावसामुळे १३६ जणांचा मृत्यू झाला. २० मार्च ते ३० ऑक्टोबर या कालावधीतवीज कोसळून झालेल्या दुर्घटनांत ५१ जणांचा मृत्यू झाला. २ एप्रिल ते ९ जून या कालावधीत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ४४ जणांचामृत्यू झाला. आपत्कालीन घटनांमध्ये प्रामुख्याने हिमस्खलन, महापूर, मुसळधार पाऊस, वादळे, वीज कोसळणे, उष्णतेच्या लाटांसह शीत लहरीसारख्या घटनांचा समावेश आहे.२०१९ साली घडलेल्या आपत्कालीन घटना आणि मनुष्यहानीजम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे ३३ जणांचा मृत्यू,  राजस्थानमध्ये महापुरासह मुसळधार पावसामुळे ८० तर वादळामुळे १४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशात वीज कोसळून २४ जणांचा मृत्यू, कर्नाटकात महापुरामुळे ४३ जणांचा मृत्यू, केरळमध्ये महापुरामुळे ८६ जणांचा मृत्यूलेहमध्ये हिमस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशात महापुरामुळे २७ जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात महापुरामुळे १०७ तर शीत लहरीमुळे २८ जणांचा मृत्यू, बिहारमध्ये आलेल्या महापुराने ३०६, तर वादळामुळे ७१ जणांचा आणि उष्णतेच्या लाटेने २९२ जणांचा मृत्यूझारखंडमध्ये वादळाने १२५ तर उष्णतेच्या लाटेने १३ जणांचा मृत्यू ओडिशामध्ये महापुरामुळे ६४ जणांचा मृत्यू

टॅग्स :Heat Strokeउष्माघात