शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 17:07 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. चक्क काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019

बंगळुरू : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले असून प्रथमच एकमेकांविरोधात गेली अनेक वर्षे लढलेले परस्पर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशातच माजी पंतप्रधान आणि कर्नाटकात नुकतीच सत्ता गमवावी लागलेल्या जेडीएस पक्षाचे नेते एच डी देवेगौडा यांनी काँग्रेसला मोलाचा सल्ला दिला आहे. 

कर्नाटकमध्येही दोन वर्षांपूर्वी काहीसे महाराष्ट्रात आता वातावरण आहे तसेच वातावरण होते. भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळाले होते. मात्र, सत्ता गमावलेल्या काँग्रेसने कमी जागा असलेल्या जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. जेडीएसच्या कुमारस्वामींनी 18 महिने रडतखडत सरकार चालविले होते. अखेर कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे देत हे सरकार पाडले होते. यामागे भाजपाचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांची खेळी असल्याचे बोलले जाते. कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात 5 डिसेंबरला या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या सगळ्या नाट्यामध्ये जेडीएसचे हात पोळले होते. आता त्याच पक्षाच्या प्रमुखाने काँग्रेसला सल्ला दिला आहे. 

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या लवकरच शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय घेणार आहेत. यातच जेडीएसचे देवेगौडा यांनी सल्ला देताना महाराष्ट्रात काँग्रेस जर शिवसेनेला पाठिंबा देणार असेल तर त्यांच्यासोबत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ रहावे. त्यांना सरकार चालवू द्यावे. 

जर काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत असेल तर पुढील पाच वर्षे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवू लागतील, अशी प्रतिक्रिया देवेगौडा यांनी दिली आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणh d deve gowdaएच. डी. देवेगौडाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019