हायव्होल्टेज ड्रामा! "मरू पण साथ सोडणार नाही"; लग्नाच्या विधीदरम्यान नवरी प्रियकरासह पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:38 IST2024-03-04T15:30:59+5:302024-03-04T15:38:04+5:30
हळदी समारंभानंतर एका मुलीने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं. मात्र त्यानंतर पोलीस आल्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.

हायव्होल्टेज ड्रामा! "मरू पण साथ सोडणार नाही"; लग्नाच्या विधीदरम्यान नवरी प्रियकरासह पळाली
बिहारच्या जमुईमध्ये प्रेमप्रकरणासंबंधित एक घटना समोर आली आहे, जे समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. हळदी समारंभानंतर एका मुलीने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं. मात्र त्यानंतर पोलीस आल्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तरुणाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी पोलिसांनाही संघर्ष करावा लागला. पोलीस जेव्हा त्या तरुणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले तेव्हा तो प्रेयसीला मिठी मारून बसला होता. त्यामुळे त्याला नेणं पोलिसांसाठी अवघड काम होतं. मुलगा आणि मुलगी एकमेकांना सोडायला अजिबात तयार नव्हते.
या घटनेबाबत सांगितलं जात आहे की, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि विधीही सुरू झाले होते. घरातील सर्वजण लग्नाबद्दल खूप आनंदी होते. मात्र नंतर प्रियकराची एन्ट्री झाली आणि वातावरणचं बदललं.
लग्नाच्या अवघ्या 8 दिवस अगोदर मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली आणि मंदिरात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. मुलगी घरी नसल्याचं पाहून घरच्यांना काळजी वाटली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, मुलगी तिच्या प्रियकरासोबत त्याच्या गावात राहत असल्याचं त्यांना समजलं. पोलीस जेव्हा मुलीच्या कुटुंबासह तेथे पोहोचले तेव्हा मुलगा आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून बसले. ते वेगळे व्हायला तयार नव्हते.
पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला असता, तो जाण्यास तयार नव्हता आणि त्याने तरुणीला मिठी मारली. मरून जाऊ पण साथ सोडणार नाही असं हे दोघं बोलत होते. त्यांना वेगळं करण्यात पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.