शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, "अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:47 IST

दहशतवाद्यांच्या एका गटाने आझाद यांना धमकी देत पत्रात त्यांच्यावर काही आरोप केले. त्या आरोपांना त्यांनी जाहीर भाषणात उत्तर दिले.

Ghulam Nabi Azad, Jammu and Kashmir Politics: काँग्रेसला काही दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिलेले गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची (Lashkar-e-Taiba) एक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (The Resistance Front) सोशल मीडियावर एक धमकीचे पत्र जारी केले. त्यात आझाद यांच्यावर काही आरोप करण्यात आले. त्या आरोपांना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आझादांनी उत्तर दिले, "माझे नाव आझाद आहे आणि माझे विचारही आझाद आहेत. द रेझिस्टन्स फ्रंटचे आरोप अयोग्य आहेत. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते (Ajit Doval) किंवा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतलेली नाही.

"अल्लाची शपथ घेऊन सांगतो..."

गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश हा अचानक झालेला नसून, एका सुनियोजित योजनेचा हा भाग आहे आणि ही योजना आधीच बनवण्यात आली होती, असे या धमकीच्या पत्रात आरोपात केले आहेत. तसेच अमित शाह यांच्याशी आझाद यांनी जम्मू काश्मीरला परतण्याआधी भेट झाली आणि त्यांच्यात एक बैठक झाली. इतकेच नव्हे तर काही विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असेही म्हटले गेले की या बैठकीत NSA डोवाल यांनाही बोलावण्यात आले होते. या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, "मी नुकतेच ऐकले आहे की माझ्याविरोधात दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आहे. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी अमित शहा आणि डोवाल यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय पण असं काहीच घडलेलं नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात डोवाल यांना कधीही भेटलेलो नाही, मी अल्लाहची शपथ घेतो."

गुलाम नबी आझाद यांनी दहशतवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, "बंदुका हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. ज्यांनी बंदुका हाती घेतल्या आहेत, त्यांना मी आवाहन करतो की बंदुका केवळ विनाशच करतात, समस्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. हे गांधींचे राष्ट्र आहे. त्यामुळे जे लोक चुकीचे वागतील ते चिरडले जातील आणि पण भारताला काहीही होणार नाही", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादAmit Shahअमित शाहAjit Dovalअजित डोवाल