शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, "अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:47 IST

दहशतवाद्यांच्या एका गटाने आझाद यांना धमकी देत पत्रात त्यांच्यावर काही आरोप केले. त्या आरोपांना त्यांनी जाहीर भाषणात उत्तर दिले.

Ghulam Nabi Azad, Jammu and Kashmir Politics: काँग्रेसला काही दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिलेले गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची (Lashkar-e-Taiba) एक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (The Resistance Front) सोशल मीडियावर एक धमकीचे पत्र जारी केले. त्यात आझाद यांच्यावर काही आरोप करण्यात आले. त्या आरोपांना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आझादांनी उत्तर दिले, "माझे नाव आझाद आहे आणि माझे विचारही आझाद आहेत. द रेझिस्टन्स फ्रंटचे आरोप अयोग्य आहेत. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते (Ajit Doval) किंवा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतलेली नाही.

"अल्लाची शपथ घेऊन सांगतो..."

गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश हा अचानक झालेला नसून, एका सुनियोजित योजनेचा हा भाग आहे आणि ही योजना आधीच बनवण्यात आली होती, असे या धमकीच्या पत्रात आरोपात केले आहेत. तसेच अमित शाह यांच्याशी आझाद यांनी जम्मू काश्मीरला परतण्याआधी भेट झाली आणि त्यांच्यात एक बैठक झाली. इतकेच नव्हे तर काही विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असेही म्हटले गेले की या बैठकीत NSA डोवाल यांनाही बोलावण्यात आले होते. या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, "मी नुकतेच ऐकले आहे की माझ्याविरोधात दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आहे. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी अमित शहा आणि डोवाल यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय पण असं काहीच घडलेलं नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात डोवाल यांना कधीही भेटलेलो नाही, मी अल्लाहची शपथ घेतो."

गुलाम नबी आझाद यांनी दहशतवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, "बंदुका हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. ज्यांनी बंदुका हाती घेतल्या आहेत, त्यांना मी आवाहन करतो की बंदुका केवळ विनाशच करतात, समस्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. हे गांधींचे राष्ट्र आहे. त्यामुळे जे लोक चुकीचे वागतील ते चिरडले जातील आणि पण भारताला काहीही होणार नाही", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादAmit Shahअमित शाहAjit Dovalअजित डोवाल