शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, "अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:47 IST

दहशतवाद्यांच्या एका गटाने आझाद यांना धमकी देत पत्रात त्यांच्यावर काही आरोप केले. त्या आरोपांना त्यांनी जाहीर भाषणात उत्तर दिले.

Ghulam Nabi Azad, Jammu and Kashmir Politics: काँग्रेसला काही दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिलेले गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची (Lashkar-e-Taiba) एक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (The Resistance Front) सोशल मीडियावर एक धमकीचे पत्र जारी केले. त्यात आझाद यांच्यावर काही आरोप करण्यात आले. त्या आरोपांना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आझादांनी उत्तर दिले, "माझे नाव आझाद आहे आणि माझे विचारही आझाद आहेत. द रेझिस्टन्स फ्रंटचे आरोप अयोग्य आहेत. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते (Ajit Doval) किंवा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतलेली नाही.

"अल्लाची शपथ घेऊन सांगतो..."

गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश हा अचानक झालेला नसून, एका सुनियोजित योजनेचा हा भाग आहे आणि ही योजना आधीच बनवण्यात आली होती, असे या धमकीच्या पत्रात आरोपात केले आहेत. तसेच अमित शाह यांच्याशी आझाद यांनी जम्मू काश्मीरला परतण्याआधी भेट झाली आणि त्यांच्यात एक बैठक झाली. इतकेच नव्हे तर काही विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असेही म्हटले गेले की या बैठकीत NSA डोवाल यांनाही बोलावण्यात आले होते. या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, "मी नुकतेच ऐकले आहे की माझ्याविरोधात दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आहे. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी अमित शहा आणि डोवाल यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय पण असं काहीच घडलेलं नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात डोवाल यांना कधीही भेटलेलो नाही, मी अल्लाहची शपथ घेतो."

गुलाम नबी आझाद यांनी दहशतवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, "बंदुका हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. ज्यांनी बंदुका हाती घेतल्या आहेत, त्यांना मी आवाहन करतो की बंदुका केवळ विनाशच करतात, समस्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. हे गांधींचे राष्ट्र आहे. त्यामुळे जे लोक चुकीचे वागतील ते चिरडले जातील आणि पण भारताला काहीही होणार नाही", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादAmit Shahअमित शाहAjit Dovalअजित डोवाल