शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

बिहारमध्ये घमासान... आता तेजस्वी यादवांनीही बाह्या सारल्या; थेट इशाराच दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 09:24 IST

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.

पाटणा - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळक बातम्यांमध्ये असताना बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी घमासान सुरू आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपासोबत युतीची घोषणा करू शकतात. त्यामुळे, महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. अद्याप यासंदर्भात कुठलेही अधिकृत विधान बड्या नेत्याने केले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका विधानाने राजकीय सत्तांतराचं 'वॉर' सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. मात्र, कुठल्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमताचा आकडा नसल्याने हा सामना अटीतटीचा असल्याचे दिसून येते. त्यातच, पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यातच, तेजस्वी यादव यांनीही अप्रत्यक्षपणे नितीशकुमारांना इशाराच दिला आहे. सहजरित्या सत्तांतर होऊ देणार नाही, व इतक्या सहजपणे पुन्हा एकदा सत्तेचा मुकूट परिधान करु देणार नाही, असे विधान तेजस्वी यादव यांनी केले आहे. त्यामुळे, बिहारच्या राजकीय भूकंपावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाला आहे. तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्यावर मध्यरात्री १ वाजता आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले असण्याची शक्यता आहे. आरजेडीकडून दलित चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरजेडीचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनाही नितीशकुमार यांनी भेट न दिल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

ममता बॅनर्जी यांनीही दिली प्रतिक्रिया

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपा