शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सत्तापटाची पहिली बाजी गेहलोत यांनी जिंकली; सचिन पायलट गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 06:42 IST

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

जयपूर : उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदारांना फोडून अशोक गेहलोत यांचे काँग्रेस सरकार खाली खेचण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कथित ‘कारस्थाना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेत पहिली बाजी मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकल्याचे चित्र सोमवारी दिसले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला काँग्रेसच्या एकूण १०७ पैकी १०२ आमदार हजर होते. शिवाय सात अपक्ष आमदारांनीही गेहलोत यांना भेटून पाठिंबा जाहीर केला. परंतु नेमक्या याच दिवशी आयकर खात्याने अशोक गेहलोत यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्यांच्या घरांवर २० ठिकाणी छापे टाकले आहेत.पण नाराजी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यासाठी काही समर्र्थक आमदारांना घेऊन दिल्लीला गेलेले पायलट बैठकीला गैरहजर होते. ही बैठक ठरल्या वेळेपेक्षा तीन तीस उशिराने सुरु झाली व येणारे आमदार माध्यमांच्या कॅमेऱ्यांपुढे बोटांनी ‘व्ही’या इंग्रजी अक्षराची विजयाची खूण करतच आत गेले.परंतु केवळ असा ठराव करून गेहलोत सरकार निर्धास्त राहू शकत नाही, हे लक्षात घेऊन बैठक संपताच काँग्रेसच्या आमदारांना जयपूर बाहेरच्या ‘फेअरमॉन्ट’ या आलिशान रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आमदारांना असे बंदोबस्तात ठेवण्याची ही दुसरी वेळ होती.गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचे सूचक विधान रविवारी करणाºया पायलट यांनी सोमवारी निदान दृश्य स्वरूपात तरी सरकार पाडण्याच्या दिशेने कोणतीही खेळी केली नाही. उलट त्यांची नाराजी अजूनही पूर्र्णपणे दूर झालेली नसली तरी ते काँग्रेस सोडणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवतीर्यांच्या हवाल्याने माध्यमांना पुरविली गेली. स्वत: पायलट नेमके कुठे आहेत, हेही दिवसभर गुलदस्त्यात ठेवले गेले. पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आलेले पायलट त्यापैकी कोणाला भेटल्याचेही कळले नाही.काँग्रेसमधील जुन्या-नव्या नेत्यांच्या ढोबळ वर्गवारीमध्ये पायलट राहुल गांधी यांचे विश्वासू व निकटचे मानले जातात. पण पायलट यांच्या नावाने राजस्थानमध्ये बंडाचे निशाण फडकविल्याची आवई उठत असतानाही राहुल गांधी यांनी मात्र गेल्या दोन दिवसांत या सर्व घटनाक्रमावर कोणतेही बाष्य केलेले नाही. असे असले तरी, काँग्रेसमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार एकीकडे पायलट यांची समजूत घालण्याचे व दुसरीकडे आमदारांची मोट घट्ट बांधून ठेवण्याचे काम पडद्यामागून तेच करत आहेत. राहुल गांधी पायलट यांच्याशी स्वत: फोनवर बोलले व नंतर त्यांच्याच सांगण्यावरून अहमद पटेल, पी. चिदम्बरम व के. सी. वेणुगोपाळ या ज्येष्ठ नेत्यांनीही पायलट यांच्याशी संपर्क साधला, असेही सांगण्यात येते. पायलट यांची समजूत काढण्यात प्रियांका गांधीही सहभागी आहेत.सूत्रांनुसार राहुल गांधी पायलट यांच्याशी बोलल्यानंतरच अजय माखन, रणदीप सिंग सुरजेवाला व अविनाश पांडे या नेत्याना जयपूरला पाठविण्यात आले. ‘काँग्रेस पक्षात पूर्ण एकजूट आहे. भाजपाला उकळ््या फुटण्याचे काही कारण नाही’, असे विमानतळावर उतरताच माध्यमांना सांगून सुरजेवाला व इतर दोघे थेट मुख्यमंत्री गेहलोत यांच्या बंगल्याकडे रवाना झाले. गेहलोत सरकारला कोणताही धोका नाही, अशी खात्री पक्षाध़्यक्षा सोनिया गांधी यांनी देऊनच ते जयपूरला आले होते व दिल्लीत ठरल्याप्रमाणेच सोमवारी जयपूरमध्ये पावले टाकली गेली, असेही सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पायलट यांचा नामोल्लेख नाहीजे कोणी काँग्रेसचे नेते अथवा आमदार सरकार अस्थिर करण्याचाप्रयत्न करत असतील किंवा यापुढे करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आग्रह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील ठरावात करण्यात आला.पण त्यात पायलट यांचा मात्र नावाने उल्लेख टाळण्यात आला. याच दृष्टीने, ह्यपक्षातील मतभेद पक्षातच मिटविले जातील. सर्वांसाठी दारे खुली आहेत, असे सांगायला सूरजेवाला विसरले नाहीत.महाराष्ट्राबाबत काँग्रेसचेनेते झाले सावधराजस्थानातील राजकीय घडामोडींपासून धडा घेत महाराष्ट्रातील कॉँग्रेसच्या आमदारांना एकसंघ ठेवा, त्यांची कामे करा अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान