शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:26 IST

"जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे."

ठळक मुद्देउमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भोपाळ : सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोडण्याच्या विचारांचे भाजपा नेत्या उमा भारती स्वागत केले आहे. आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा, असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती. म्हणून मी सोनिया गांधी यांना भरपूर मानते आणि त्या आदराच्या भावनेनेच मी असे बोलत आहे, असे विधान उमा भारती यांनी केले आहे. 

याचबरोबर, भारतीय लोकांनी अमेरिकेत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत अभिमान बाळगावा, असेही उमा भारती यांनी सांगितले. कमला हॅरिस या अमेरिकी आहेत, तशाच त्या भारतीय देखील आहेत. त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकेत जन्माला आलेल्या महिला आहेत. त्यांच्या संपूर्ण निष्ठा या अमेरिकेशी जोडलेल्या आहेत. भारतीयांना जर अभिमान बाळगायचाच असेल तर अशा लोकांचा बाळगा जे भारतीय आहेत आणि त्यांनी जगात नाव कमावले आहे, असे उमा भारती म्हणाल्या.

जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे. अमेरिकेचे मूळ लोक रेड इंडियन आहेत. अमेरिकेत आज जे लोक आहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांच्यापैकीच कमला हॅरिस या एक आहेत, असे उमा भारती यांनी सांगितले. याशिवाय, ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत भारतीय लोकांना अभिमान बाळगावा, अशा महिलांमध्ये इंदिरा गांधी आहेत, सुषमा स्वराज आहेत, तसेच आणखी कितीतरी लोक आहेत, कितीतरी महिला आहेत, असेही उमा भारती म्हणाल्या.

याशिवाय, उमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर मला अतिशय दु:ख झाले. हे सर्व प्रकरण आता कोर्टात आहे. सीबीआयही जगातीव मान्यताप्राप्त संस्था आहे. आम्ही त्यांच्या तपासकार्यावर परिणाम होईल असे काही बोलता कामा नये, असे उमा भारती यांनी सांगितले. तसेच, रिया चक्रवर्ती कोण आहे, हे मला माहीत नाही. मात्र, ज्या व्यक्तीचा गुन्हा जोपर्यंत सिद्ध झालेला नाही, तो पर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार आहे, असे मानता कामा नये. अशा व्यक्तीला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, किती दु:ख सहन करावे लागत असेल?. मात्र, नंतर ती व्यक्ती निर्दोष सिद्ध झाल्यानंतर तिने भोगलेल्या दु:खापासून तिला कशी काय मुक्ती मिळणार? म्हणूनच मी म्हणते की हे प्रकरण प्रसारमाध्यमे आणि नेत्यांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. यावर राजकारण करू नये, असे उमा भारती यांनी म्हटले.

दरम्यान, काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेली खडाखडी अशा गेले दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय झाला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस