शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

"...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:26 IST

"जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे."

ठळक मुद्देउमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भोपाळ : सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोडण्याच्या विचारांचे भाजपा नेत्या उमा भारती स्वागत केले आहे. आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा, असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती. म्हणून मी सोनिया गांधी यांना भरपूर मानते आणि त्या आदराच्या भावनेनेच मी असे बोलत आहे, असे विधान उमा भारती यांनी केले आहे. 

याचबरोबर, भारतीय लोकांनी अमेरिकेत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत अभिमान बाळगावा, असेही उमा भारती यांनी सांगितले. कमला हॅरिस या अमेरिकी आहेत, तशाच त्या भारतीय देखील आहेत. त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकेत जन्माला आलेल्या महिला आहेत. त्यांच्या संपूर्ण निष्ठा या अमेरिकेशी जोडलेल्या आहेत. भारतीयांना जर अभिमान बाळगायचाच असेल तर अशा लोकांचा बाळगा जे भारतीय आहेत आणि त्यांनी जगात नाव कमावले आहे, असे उमा भारती म्हणाल्या.

जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे. अमेरिकेचे मूळ लोक रेड इंडियन आहेत. अमेरिकेत आज जे लोक आहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांच्यापैकीच कमला हॅरिस या एक आहेत, असे उमा भारती यांनी सांगितले. याशिवाय, ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत भारतीय लोकांना अभिमान बाळगावा, अशा महिलांमध्ये इंदिरा गांधी आहेत, सुषमा स्वराज आहेत, तसेच आणखी कितीतरी लोक आहेत, कितीतरी महिला आहेत, असेही उमा भारती म्हणाल्या.

याशिवाय, उमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर मला अतिशय दु:ख झाले. हे सर्व प्रकरण आता कोर्टात आहे. सीबीआयही जगातीव मान्यताप्राप्त संस्था आहे. आम्ही त्यांच्या तपासकार्यावर परिणाम होईल असे काही बोलता कामा नये, असे उमा भारती यांनी सांगितले. तसेच, रिया चक्रवर्ती कोण आहे, हे मला माहीत नाही. मात्र, ज्या व्यक्तीचा गुन्हा जोपर्यंत सिद्ध झालेला नाही, तो पर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार आहे, असे मानता कामा नये. अशा व्यक्तीला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, किती दु:ख सहन करावे लागत असेल?. मात्र, नंतर ती व्यक्ती निर्दोष सिद्ध झाल्यानंतर तिने भोगलेल्या दु:खापासून तिला कशी काय मुक्ती मिळणार? म्हणूनच मी म्हणते की हे प्रकरण प्रसारमाध्यमे आणि नेत्यांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. यावर राजकारण करू नये, असे उमा भारती यांनी म्हटले.

दरम्यान, काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेली खडाखडी अशा गेले दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय झाला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस