शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून माजी उप राष्ट्रपती हामीद अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य, शिया धर्मगुरूंनी साधला निशाणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 21, 2020 19:41 IST

माजी उप राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देउप राष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.माजी राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे. शिया धर्मगुरू म्हणाले, आपल्या देशात कट्टरता नाही.

नवी दिल्ली - नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे माजी उप राष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादाला 'महामारी', असे म्हटले आहे. शशी थरूर यांचे नवे पुस्तक 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग'च्या प्रकाशनदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, सध्या आपला देश 'प्रकट आणि अव्यक्त' विचार तथा विचारधारांच्या धोक्यातून जात आहे. यात देशाला 'आपण आणि ते' या काल्पनिक श्रेणीच्या आधारावर वाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिया धर्मगुरूंनी साधला निशाणा -माजी उप राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे. शिया धर्मगुरू म्हणाले, आपल्या देशात कट्टरता नाही. आपला देश एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे हिंदू, मुस्लीम,शीख,ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी लोक एकत्रित राहतात. माझा देश एखाद्या पुष्पगुच्छा प्रमाणे आहे.

हामीद अन्सारी यांना बोलायचेच होते, तर त्यांनी कुण्या एका व्यक्तीवर बोलायचे होते. संपूर्ण देशाला आपल्या बोलण्यात सामील करायचे नसते. येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हिंदू, मुसलमान, शीख सर्वच भावांनी रक्तत सांडले आहे. हामीद अन्सारी हे काय म्हणत आहेत, की आपल्या संपूर्ण देशात कट्टरतेचे वातावरण आहे? मात्र, असे नाही. आपल्या देशात कसल्याही प्रकारचे कट्टरतेचे वातावरण नाही. कारण येथे हिंदूंचा दरवाजा मुसलमानांच्या दरवाज्याला लागून आहे. तसेच मुसलमानांचा दरवाजाही हिंदू भावांच्या दरवाजाला लागून आहे. येथे नातलग नंतर उभे राहतात, आधी मित्र आणि जिवाभावाचे लोक उभे राहतात.

आणखी काय म्हणाले होते अन्सारी - चार वर्षांच्या अल्पावधीतच, भारत उदारमतवादी राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टीकोनातून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नवीन राजकीय दृष्टीकडे वाटचाल करत आहे. जी सार्वजनिक क्षेत्रात दृढपणे कार्यरत आहे. कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे.” धार्मिक कट्टरपणा आणि कट्टरपंथी राष्ट्रवादाच्या तुलनेत. देशप्रेम ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे असं हमीद अन्सारी म्हणाले.

फारूक अब्दुल्लांनीही घेतला होता चर्चेत भाग -या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान चर्चेत भाग घेत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले, "१९४७मध्ये आम्हाला पाकिस्तानबरोबर जाण्याची संधी होती, परंतु माझ्या वडिलांना आणि इतरांना असे वाटले की, दोन राष्ट्रांचे तत्त्व आमच्यासाठी चांगले नाही. सध्याचे सरकार ज्या दृष्टीने देशाकडे पाहत आहे, त्याला कधीही स्वीकारणार नाही. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरIslamइस्लामMuslimमुस्लीमHinduहिंदूIndiaभारत