शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 12:35 PM

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे.

इंदोर: माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे. इंदोरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सलमान खुर्शीद यांनी यावरून उघडपणे भाष्य केले. देशातील वातावरण बिघडत चालले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला आहे. भारतातील नागरिक सुखी असल्याचे पाहायला मिळत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे लोभ तसेच दुसरे म्हणजे बदल घडवणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.  

देशातील वाढत्या जातीय तणावावरही त्यांनी आपले मत मांडले. सलमान खुर्शीद म्हणाले की, आजच्या घडीला देशात जातीय बाबींना जाणीवपूर्वक महत्त्व दिले जात आहे. विविध वर्गांमध्ये तेढ वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक एकमेकांवर घृणास्पद आरोप करत आहेत. यामागे राजकीय कारणे आहेत. देशवासीयांची विचारसरणी अशी नाही. याला कोणीतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपण सयंम बाळगला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे

नुपूर शर्माप्रकरणी बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणतीच उच्च संस्था नाही. सर्वोच्च न्यायालयाला आदरपूर्वक सांगू शकतो की, यावर पुनर्विचार करावा. परंतु, सर्वोच्च न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. 

लोभामुळे हे सगळे घडतेय

देशात उद्भवलेल्या सद्य स्थितीमागील कारण लालसा, लोभ असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. आता पैसा चालत नाही, मग लोक धर्माचा आसरा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला आता अशा नेतृत्वाची गरज आहे, जे या विचारसरणीत बदल घडवून आणेल, जसा बदल राष्ट्रपिता महात्मा गांधीनी घडवून आणला होता, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेसने आपल्या सद्यस्थितीबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. या देशात नेमके असे काय बदल झाले आहेत, ज्यामुळे आपण देशातील राजकारणात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेले आहोत, असे नमूद करत, देशातील वातावरण चांगले नसून, देशवासी सुखाने नांदताना दिसत नाहीत, असा दावा खुर्शीद यांनी केला.  

टॅग्स :Politicsराजकारणsalman khurshidसलमान खुर्शिदCentral Governmentकेंद्र सरकार