शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:43 IST

2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बंगळुरू -  2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, राहुल गांधीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींची दावेदारी भक्कम झाल्याचे मानण्यात येत आहे.  राहुल गांधीना गैर भाजपाई दलांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याबाबत प्रतिक्रिया देताना देवेगौडा म्हणाले, "राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास त्यांचा पक्ष तयार आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही."  कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.  राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली होती. तसेच  या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यावरही जोर देण्यात आला. तसेच सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते असल्याने राहुल गांधी यांनाच आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्यात यावा यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान आग्रही मागणी केली, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  2019 साठी काँग्रेसचे मिशन ३०० २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला. या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसElectionनिवडणूकH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाkumarswamyकुमारस्वामीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी