शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:43 IST

2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बंगळुरू -  2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, राहुल गांधीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींची दावेदारी भक्कम झाल्याचे मानण्यात येत आहे.  राहुल गांधीना गैर भाजपाई दलांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याबाबत प्रतिक्रिया देताना देवेगौडा म्हणाले, "राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास त्यांचा पक्ष तयार आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही."  कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.  राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली होती. तसेच  या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यावरही जोर देण्यात आला. तसेच सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते असल्याने राहुल गांधी यांनाच आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्यात यावा यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान आग्रही मागणी केली, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  2019 साठी काँग्रेसचे मिशन ३०० २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला. या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसElectionनिवडणूकH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाkumarswamyकुमारस्वामीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी