शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

"लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 18:11 IST

पाटणा : लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही, ज्यांच्या एका शब्दावर देश एक झाला. मोदीनी कोरोनाचा सामना ...

ठळक मुद्देअमित शहा म्हणाले, हे पहिल्यांदाच घडले आहे, की एका महामारीविरोधात संपूर्ण देश, सरकारे एकत्र आली आहेत.अनेक सर्व्हे झाले मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे. 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी पाहाडासारखी उभी आहे - शहास्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा आहे. मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक एक्सप्रेस चालवण्याचे निश्चित केले.

पाटणा : लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही, ज्यांच्या एका शब्दावर देश एक झाला. मोदीनी कोरोनाचा सामना करण्यासाठी एक जनता कर्फ्यूची हाक दिली. संपूर्ण देश एकत्र आला आणि त्याने पंतप्रधान मोदींच्या या शब्दाचा सन्मान करत काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन केले. मग पंतप्रधन मोदींनी भलेही दिवे लावायला सांगितले असतील अथवा टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करायला सांगितला असेल. जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीली. काही लोक याला राजकीय प्रचार म्हणत आहेत. मात्र, त्यांना हे माहित नाही, की हा राजकीय प्रचार नसून देशाला एक करण्याची मोहीम आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. त्यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

CoronaVirus News: भारतात 100 दिवसांत होणार कोरोनाचा खात्मा, पण...; तज्ज्ञांनी व्यक्त केली 'ही' गंभीर भीती!

मी बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो, की हे पहिल्यांदाच घडले आहे, की एका महामारीविरोधात संपूर्ण देश, सरकारे एकत्र आली आहेत. एक देश आणि एका मनाचे हे उदाहरण आहे. अनेक सर्व्हे झाले मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे. 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी पाहाडासारखी उभी आहे, असेही शहा म्हणाले.

कलम 370, तीन तलाकला दिला तलाक -देशात अनेक समस्या होत्या मोदी सरकारने त्या चुटकी सरशी सोडवल्या. ठोस पावले उचलली. भारताने सीमेवर शत्रूला चोख प्रत्त्युत्तर दिले. आमच्या सरकारने 'सबकासाथ सबका विकास' करण्याबरोबरच देशाच्या सीमाही सुरक्षित केल्या. अनेक वर्षांपासून 370ची केवळ चर्चा होत होती. मात्र, आणच्या सरकारने 370 कलम क्षणात नष्ट केले. आमच्या मुस्लीम भगिनींनाही मोदी सरकारने तीन तलाकला तलाक देऊन मोठा दिलासा दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर आता राम मंदिर निर्माणाचा मार्गही प्रशस्त झाला आहे, असे शहा म्हणाले.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

दिल्लीत बसून मौज केरण्यापेक्षा जनतेशी संवाद साधा, कुणी अडवलं? -विरोधक या रॅलीचा संबंध निवडणुकीशी जोडत आहेत. मात्र, या रॅलीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. कोरोनाच्या महामारीशी लढताना जनसंपर्क होणे अश्यक्य आहे. त्यामुळे या रॅलिच्या माध्यमाने लोकांशी जनसंपर्क साधत आहोत. विरोधकांना कुणीही आडवले नाही. ते दिल्लीत बसून मौज केरण्यापेक्षा अशा पद्धतीने लोकांशी का संवाद साधात नाहीत? असा सवाल करत भाजपचे माजी अधक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!

आरजेडीवर बरसले शहा -अमित शहा यांनी आरजेडीच्या थाळी वाजवण्याच्या अभियानाव निशाणा साधला शहा म्हणाले, अखेर पंतप्रधान मोदी यांच्या थाळी वाजविण्याच्या आवाहनाचा विरोधकांवरही परिणाम झाला आहे. ही रॅली काही निवडणूक रॅली नाही. ही व्हर्च्युअल रॅली देशातील जनतेला कोरोनाविरोधात जोडण्यासाठी आहे. मात्र, वक्रदृष्टीने पाहणारे विरोधक यावरही प्रश्नचिन्ह लावत आहेत.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

स्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा -स्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा आहे. मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक एक्सप्रेस चालवण्याचे निश्चित केले. बिहारमधील मजुरांसाठी बिहार सरकारने सर्वप्रकारची व्यवस्था केली होती. त्यांना केवळ 1100 रुपयांची मदतच केली गेली नाही, तर त्यांच्या रोजगाराची तयारीही केली जात आहे. याशिवाय PDSमधून बिहारसाठी 6 हजार कोटींचे धान्यही दिले गेले, असेही शहा म्हणाले. याशिवाय शहा यांनी केंद्राकडून बिहारला मिळालेल्या आणि देशात केलेल्या इतर कामांचाही पाढा वाचला.

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाBiharबिहार