शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

"लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 18:11 IST

पाटणा : लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही, ज्यांच्या एका शब्दावर देश एक झाला. मोदीनी कोरोनाचा सामना ...

ठळक मुद्देअमित शहा म्हणाले, हे पहिल्यांदाच घडले आहे, की एका महामारीविरोधात संपूर्ण देश, सरकारे एकत्र आली आहेत.अनेक सर्व्हे झाले मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे. 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी पाहाडासारखी उभी आहे - शहास्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा आहे. मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक एक्सप्रेस चालवण्याचे निश्चित केले.

पाटणा : लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही, ज्यांच्या एका शब्दावर देश एक झाला. मोदीनी कोरोनाचा सामना करण्यासाठी एक जनता कर्फ्यूची हाक दिली. संपूर्ण देश एकत्र आला आणि त्याने पंतप्रधान मोदींच्या या शब्दाचा सन्मान करत काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन केले. मग पंतप्रधन मोदींनी भलेही दिवे लावायला सांगितले असतील अथवा टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करायला सांगितला असेल. जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीली. काही लोक याला राजकीय प्रचार म्हणत आहेत. मात्र, त्यांना हे माहित नाही, की हा राजकीय प्रचार नसून देशाला एक करण्याची मोहीम आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. त्यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

CoronaVirus News: भारतात 100 दिवसांत होणार कोरोनाचा खात्मा, पण...; तज्ज्ञांनी व्यक्त केली 'ही' गंभीर भीती!

मी बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो, की हे पहिल्यांदाच घडले आहे, की एका महामारीविरोधात संपूर्ण देश, सरकारे एकत्र आली आहेत. एक देश आणि एका मनाचे हे उदाहरण आहे. अनेक सर्व्हे झाले मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे. 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी पाहाडासारखी उभी आहे, असेही शहा म्हणाले.

कलम 370, तीन तलाकला दिला तलाक -देशात अनेक समस्या होत्या मोदी सरकारने त्या चुटकी सरशी सोडवल्या. ठोस पावले उचलली. भारताने सीमेवर शत्रूला चोख प्रत्त्युत्तर दिले. आमच्या सरकारने 'सबकासाथ सबका विकास' करण्याबरोबरच देशाच्या सीमाही सुरक्षित केल्या. अनेक वर्षांपासून 370ची केवळ चर्चा होत होती. मात्र, आणच्या सरकारने 370 कलम क्षणात नष्ट केले. आमच्या मुस्लीम भगिनींनाही मोदी सरकारने तीन तलाकला तलाक देऊन मोठा दिलासा दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर आता राम मंदिर निर्माणाचा मार्गही प्रशस्त झाला आहे, असे शहा म्हणाले.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

दिल्लीत बसून मौज केरण्यापेक्षा जनतेशी संवाद साधा, कुणी अडवलं? -विरोधक या रॅलीचा संबंध निवडणुकीशी जोडत आहेत. मात्र, या रॅलीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. कोरोनाच्या महामारीशी लढताना जनसंपर्क होणे अश्यक्य आहे. त्यामुळे या रॅलिच्या माध्यमाने लोकांशी जनसंपर्क साधत आहोत. विरोधकांना कुणीही आडवले नाही. ते दिल्लीत बसून मौज केरण्यापेक्षा अशा पद्धतीने लोकांशी का संवाद साधात नाहीत? असा सवाल करत भाजपचे माजी अधक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!

आरजेडीवर बरसले शहा -अमित शहा यांनी आरजेडीच्या थाळी वाजवण्याच्या अभियानाव निशाणा साधला शहा म्हणाले, अखेर पंतप्रधान मोदी यांच्या थाळी वाजविण्याच्या आवाहनाचा विरोधकांवरही परिणाम झाला आहे. ही रॅली काही निवडणूक रॅली नाही. ही व्हर्च्युअल रॅली देशातील जनतेला कोरोनाविरोधात जोडण्यासाठी आहे. मात्र, वक्रदृष्टीने पाहणारे विरोधक यावरही प्रश्नचिन्ह लावत आहेत.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

स्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा -स्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा आहे. मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक एक्सप्रेस चालवण्याचे निश्चित केले. बिहारमधील मजुरांसाठी बिहार सरकारने सर्वप्रकारची व्यवस्था केली होती. त्यांना केवळ 1100 रुपयांची मदतच केली गेली नाही, तर त्यांच्या रोजगाराची तयारीही केली जात आहे. याशिवाय PDSमधून बिहारसाठी 6 हजार कोटींचे धान्यही दिले गेले, असेही शहा म्हणाले. याशिवाय शहा यांनी केंद्राकडून बिहारला मिळालेल्या आणि देशात केलेल्या इतर कामांचाही पाढा वाचला.

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाBiharबिहार